आज दुपारनंतर तीन पॉझिटिव्ह,दोघांचा मृत्यू तर ५३ रुग्ण बरे
औरंगाबाद, ता. ३१ : जिल्ह्यात आज दुपारनंतर तीन रुग्णांची भर पडल्याने दिवसभरातली संख्या ४५ झाली. मात्र दिलासादायक बाब म्हणजे आज ५३ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने तर ४४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या आकडेवारीत सकाळी ४२ तर दुपारनंतर तीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने कोरोनाबाधितांचा आकडा १५४३ झाला आहे. आतापर्यंत एकूण १०२९ रूग्णांना उपचारानंतर घरी सोडले तर आज दोन रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ७२ झाला आहे. सद्यस्थितीत ४४२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
आज कोरोनाबाधित रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. भवानी नगर, जुना मोंढा (०४), कैलास नगर, गल्ली क्रमांक-२ (०३), एन-६ सिडको (०३), जाफर गेट, जुना मोंढा (०१), गल्ली क्रमांक १७, संजय नगर, मुकुंदवाडी (०१), गल्ली क्रमांक चार रहीम नगर, जसवंतपुरा (०१), व्यंकटेश नगर, जालना रोड (०१), समता नगर (०१), नवीन बायजीपुरा (०१), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (1),किराडपुरा (3), पिसादेवी रोड (1), बजाज नगर (०१), देवळाई परिसर (०१), नाथ नगर (०१), बालाजी नगर (०१), हमालवाडी (०१), जुना बाजार (०२), भोईवाडा (०१), मनजित नगर, आकाशवाणी परिसर (०२), सुराणा नगर (०१), अझम कॉलनी (०१), सादात नगर (०१), महेमुदपुरा, हडको (०१), निझामगंज कॉलनी (०१), शहागंज (०१), गल्ली क्रमांक २४ संजय नगर (०१), बीड बायपास रोड (०१), स्वप्न नगरी (०१), इतर (०२), दुपारनंतर चंपा चौक (०१), शताब्दी नगर (०१), इतर (०१) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २६ महिला आणि १९ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) आज ३१ मे रोजी ६२ वर्षीय महिला व जुना बाजार येथील ७५ वर्षीय पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ६१, खासगी रुग्णालयात १०, मिनी घाटीमध्ये ०१ कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने एकूण ७२ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.