औरंगाबाद, ता. २५ : औरंगाबादेत एकाच दिवशी सोमवारी (ता.२५) पाच कोरोनाबधितांचा मृत्यू झाला असून, बळींचा आकडा ५५ वर गेला आहे.
२४ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता कटकट गेट येथील ५५ वर्षीय महिलेचा तर गारखेडा येथील ४८ वर्षीय पुरूषाचा रात्री ९.३५ वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. २५ मे रोजी मध्यरात्री एक वाजता रोहिदास नगर, मुकुंदवाडी येथील ३५ वर्षीय महिला, कैलास नगर येथील ७५ वर्षीय महिला पहाटे सव्वा तीनच्या सुमारास तर सिल्लोड येथील अब्दलशहा नगर येथील ५५ वर्षीय महिलेचा सकाळी साडेसहाच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या मृतांमध्ये एक पुरुष आणि चार महिला रुग्णांचा समावेश आहे. घाटीत आतापर्यंत ५० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या घाटी रुग्णालयात 70 कोरोना बाधितांवर उपचार सुरू असल्याचेही प्रशासनाने कळवले आहे.
२४ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता कटकट गेट येथील ५५ वर्षीय महिलेचा तर गारखेडा येथील ४८ वर्षीय पुरूषाचा रात्री ९.३५ वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. २५ मे रोजी मध्यरात्री एक वाजता रोहिदास नगर, मुकुंदवाडी येथील ३५ वर्षीय महिला, कैलास नगर येथील ७५ वर्षीय महिला पहाटे सव्वा तीनच्या सुमारास तर सिल्लोड येथील अब्दलशहा नगर येथील ५५ वर्षीय महिलेचा सकाळी साडेसहाच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या मृतांमध्ये एक पुरुष आणि चार महिला रुग्णांचा समावेश आहे. घाटीत आतापर्यंत ५० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या घाटी रुग्णालयात 70 कोरोना बाधितांवर उपचार सुरू असल्याचेही प्रशासनाने कळवले आहे.
----
कोरोना मिटर
एकूण रुग्ण - १३०१
बरे झाले - ६३०
उपचार घेत आहेत - ६२१
मृत्यू - ५५
