शुक्रवार, २९ मे, २०२०

Corona update :

जिल्ह्यात आज तब्बल ४६ रुग्णांची वाढ, एकूण ४८४ रुग्णांवर उपचार सुरू



औरंगाबाद, ता. २९ : जिल्ह्यात आज ४६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होऊन एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४५३ झाली आहे. यापैकी ९०१ कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, ६८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ४८४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. नेहरू नगर, कटकट गेट (०१), कैलास नगर, माळी गल्ली (०१), एन सहा सिडको (०१), भूषण नगर, पहाडे कॉर्नर (०२), कैलाश नगर (०१), श्रीनिकेतन कॉलनी (०१), खडकेश्वर (०१), उस्मानपुरा (०१), खंडोबा मंदिर, सातारा गाव (०२), इटखेडा (०३), उस्मानपुरा (०३), जुना बाजार (०१), विश्रांती कॉलनी एन-२ (०३), नारळी बाग गल्ली नंबर दोन (०१), राशेदपुरा, गणेश कॉलनी (०१), शिवशंकर कॉलनी, गल्ली नंबर एक (०१), बायजीपुरा गल्ली नंबर (०१), एन-४ विवेकानंद नगर,सिडको (०१), शिवाजी नगर (०१), एन-६ संभाजी कॉलनी (०१), गजानन नगर एन-११ हडको (५), भवानी नगर, जुना मोंढा (०१), जुना बायजीपुरा (०२), किराडपुरा (०१), रोशनगेट (०१), राशीदपुरा (०१), मोतीवाला नगर (०१), दौलताबाद (०२), वाळूज सिडको (०२) व राम नगर, कन्नड (०३) या भागातील कोरानाबाधितांचा समावेश आहे. यामध्ये १४ महिला आणि ३२ पुरुष रुग्ण आहेत.

कोरोना मीटर
एकूण रुग्ण १४५३
बरे झाले ९०१
मृत्यू ६८
उपचार सुरू ४८४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना त्वरित खत मिळाले नाही तर कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, सिल्लोड भाजपचा निवेदनाद्वारे इशारा

सिल्लोड : उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात युरिया त्वरित उपलब्ध करावा ...

लोकप्रिय बातम्या व लेख