मंगळवार, २६ मे, २०२०

राज्य सरकारमध्ये काँग्रेसला मोठया निर्णयाचे अधिकार नाहीत-राहुल गांधी

नवी दिल्ली, ता. २६ : ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला मोठ्या निर्णयाचे अधिकार नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
दोन दिवसापासून राज्यात होत असलेल्या हालचाली थंड होत नाहीत तोच राहुल गांधीच्या या वक्तव्याने वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष नाना पाटोळे यांनी राहुल गांधी यांना भेटीची वेळ मगिल्याने या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे सरकार स्थिर असून, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या पाठिशी भक्कमपणे उभी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांना दिली आहे.
सरकार पूर्ण पाच वर्षे चालेल आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका तिन्ही पक्ष मिळून लढवू असा टोला खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला.

३ टिप्पण्या:

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना त्वरित खत मिळाले नाही तर कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, सिल्लोड भाजपचा निवेदनाद्वारे इशारा

सिल्लोड : उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात युरिया त्वरित उपलब्ध करावा ...

लोकप्रिय बातम्या व लेख