औरंगाबाद, ता.२८ : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजना आणि त्या घेण्यात येत असलेली खबरदारी याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज २८ मे रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच या वेळेत जनतेशी प्रथमच Facebook LIVE स्वरूपात संवाद साधणार आहेत. तेव्हा नागरिकांनी त्यांच्या मनातील शंका, समस्या, प्रश्न फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडावेत. असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी उदय चौधरी https://www.facebook.com/DIOAuranagabd आणि https://www.facebook.com/mukund.chilwant.98 या दोन फेसबुक लिंकवरून नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा