बुधवार, २७ मे, २०२०

पेरणीपूर्वी सोयाबीनची उगवण क्षमता तपासावी- योगेश हराळ

निल्लोड (ता. सिल्लोड) : सोयाबीन बियाणे उगवण क्षमता प्रात्याक्षिक दाखविताना कृषी सहायक योगेश हराळ सोबत शेतकरी.

औरंगाबाद, ता. २७ : निल्लोड (ता. सिल्लोड) येथे कृषि विभागामार्फत सोयाबीन बियाणे उगवण क्षमता प्रात्याक्षिके बुधवारी (ता. २७) घेण्यात आली. बियाणांची उगवण क्षमता तपासुन पेरणी करावी असा सल्ला कृषि सहाय्यक योगेश हराळ यांनी शेतकर्‍यांना दिला आहे.

सोयाबीन हे स्वपराग सिंचीत पीक असल्याने या पिकाचे बियाणे सरळ वानांचे आहे. दरवर्षी बदलाची आवश्यकता नाही. शेतकर्‍यांनी हे बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. प्रमाणीत बियाणांपासून उत्पादीत बियाणांची चाळणी करुन चांगल्या प्रतिच्या बियाणांची निवड करावी. उगवण क्षमतेनुसार पेरणी करता बियाणांचे प्रमाण ठरविता येऊ शकेल. यासाठी तीन पध्दती देण्यात आल्या आहेत. मातीमध्ये उगवण क्षमता तपासावी, कुंडीत बियाणे तपासावे, वर्तमानपत्राचा कागद वापरुन बियाणाची तपासणी करावी. उगवण क्षमता ७० टक्के पेक्षा कमी प्रमाणात असल्यास त्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावेत. जीवाणू संवर्धके व बुरशी नाशकाची बीज प्रक्रिया करुन ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर सोयाबीनची पेरणी करावी असा सल्ला कृषि विभागामार्फत दिला आहे.

तालुका कृषी अधिकारी दिपक गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सोयाबीन उगवण क्षमता चाचणी प्रात्याक्षिक घेण्यात आली. या कार्यक्रमास कृषि सहायक विठ्ठल गोराडे, कृषिमित्र रविंद्र मगर, सुभाष आहेर, गिरजाराम खटाळ,  संतोष सहाणे आदी शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना त्वरित खत मिळाले नाही तर कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, सिल्लोड भाजपचा निवेदनाद्वारे इशारा

सिल्लोड : उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात युरिया त्वरित उपलब्ध करावा ...

लोकप्रिय बातम्या व लेख