औरंगाबाद, ता. २८ : जिल्ह्यात आज ३५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या चार दिवसांपासून रुग्णसंख्येत घट झाली तर बरे होणाऱ्या रुग्णामध्ये वाढ झाल्याने उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या ५०१ झाली आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. बायजीपुरा (०१), मिसारवाडी (०१), वाळूज महानगर एक, बजाज नगर (०१), संजय नगर (०१), शहागंज (०१), हुसेन कॉलनी (०१), कैलास नगर (०१), रोकडिया हनुमान कॉलनी (०२), उस्मानपुरा (०१), इटखेडा (०१), एन-४ (०३), नारळीबाग (०२), हमालवाडी (०४), रेल्वे स्टेशन परिसर (०२), सिटी चौक (०१), नाथ नगर (०१), बालाजी नगर (०१), साई नगर एन-६ (०१), संभाजी कॉलनी, एन-६ (०२), करीम कॉलनी रोशन गेट (०१) अंगुरी बाग (०१), तानाजी चौक, बालाजी नगर (०१), एन-११ हडको (०१), जय भवानी नगर (०२), अन्य (०१) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये १४ महिला आणि ११ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना मीटर
एकूण १३९७
बरे झाले ८३१
मृत्यू ६५
उपचार सुरु ५०१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा