बुधवार, ३ जून, २०२०

पावसाळ्यात कोरोना वाहून जाणार की जगणार? काय आहेत जगभरातील तज्ञांचे अंदाज

कोरोना विषाणुच्या संक्रमणामुळे जगभरात लाखो नागरीक बाधित झाले तर हजारो नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतासह विविध देशांच्या शास्रज्ञांचे कोरोनाला प्रतिबंध करणारी लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र अद्याप त्याला यश आले नाही. मात्र जगभरात कोरोना बाधितांचा आकडा लाखोंच्या संख्येने वाढत चालला आहे. डिसेंबर-२०१९ म्हणजेच ऐन हिवाळ्यात आलेला कोरोना उन्हाळ्यात उष्णतेमुळे नष्ट होईल अशा प्रकारच्या बातम्या सुरवातीला पसरल्या होत्या मात्र उन्हाळ्याचा त्यावर कोणताही परीणाम झाल्याचे दिसुन आले नाही याउलट बाधितांची संख्या वाढतच गेली. पावसाळ्यात कोरोना विषाणूची झपाट्याने वाढ होईल असा अंदाज अनेक तज्ञांनी यापर्वीही व्यक्त केला आहे. यंदा जुनच्या प्रारंभालाच महाराष्ट्रात अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मात्र कोरोनाचे काय होईल याची नागरीकांना उत्सुकते बरोबरच चिंता सुद्धा लागली आहे.

कोरोना विषाणू पावसाच्या पाण्यात वाहून जाईल की कोरोना विषाणू वाढण्याला पाऊस कारणीभुत ठरेल याबाबत जगातील शास्त्रज्ञांमध्ये मतभिन्नता आहेत. त्यात अनेक तज्ञांच्या मते पावसामुळे कोरोनाचा विषाणु मोठ्याप्रमाणात पसरेल तर काहीं तज्ञांनी कोरोना पावसाच्या पाण्यात वाहून जाईल अशी शक्यता व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या जॉन्स हापकिन्स युनिव्हर्सिटीतील अप्लाइड फिजिक्सचे शास्त्रज्ञ जेर्ड इवांस यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, हात-पाय किंवा चेहरा केवळ पाण्याने धुतला तर कोरोना व्हायरस नष्ट होणार नाही त्यासाठी आपल्याला हँडवॉश किंवा साबणाचाच वापर करावाच लागेल. मात्र ‘पावसाळ्यात कोरोना व्हायरसचा परिणाम काय आणि कीती होईल याचा अंदाज अद्याप आलेला नाही.

'पावसाच्या पाण्याने कोरोनाचा विषाणू मरणार नाही. यामुळे कोरोनाचा प्रसार कमी होईलच याची शाश्वती देता येणार नाही' - जेनिफर होर्ने (शास्त्रज्ञ, संसर्गजन्य रोग विभाग, डेलावेअर युनिव्हर्सिटी)

ज्याप्रमाणे धुळीचे कण पावसाच्या पाण्यात वाहून जातात त्याप्रमाणे पावसाळ्यात पडलेल्या पाण्यामुळे कोरोना वाहुन जाईल व त्याचा प्रसार कमी होण्यास मदत होईल. - जेई बेटेन (प्राध्यापक, जागतिक आरोग्य, औषध आणि साथीचे रोग वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी)

आपण आपले हात पाण्याने धुऊन घेतल्यास व्हायरस मरणार नाही, त्यासाठी आपल्याला आपले हात, पाय किंवा चेहरा हँडवॉशने किंवा साबणाने धुवावेच लागतील. पावसाळ्याच्या तोंडावर जगभरातील तज्ञांनी कोरोना विषाणुला रोखण्यासाठी व प्रसार होऊ नये यासाठी फिजिकल डिस्टंसिंगसह तोंडाला मास्क या सारख्या नेहमी घेत असलेल्या खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात हवामानातील आर्द्रता जास्त असल्यामुळे कोरोनाचा विषाणु अनेक दिवस हवेत जिवंत राहु शकत असल्याने या विषाणुचा वेगाने प्रसार होऊन संक्रमण वाढण्याचा धोका असल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना त्वरित खत मिळाले नाही तर कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, सिल्लोड भाजपचा निवेदनाद्वारे इशारा

सिल्लोड : उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात युरिया त्वरित उपलब्ध करावा ...

लोकप्रिय बातम्या व लेख