बुधवार, २४ जून, २०२०

भारत-चीन युद्धाची शक्यता आहे का? होय शक्यता आहे. कसे ते वाचा


भारत चीन युद्धाची शक्यता आहे का? ह्याचे उत्तर होय असे आहे. नक्कीच शक्यता आहे.

भारत-चीन किंवा भारत-पाक अणुयुद्ध होईल का? ह्याचे उत्तर नाही असे आहे. जगातील कोणताही देश किंवा अतिरेकी संघटना अणुबॉम्ब चा वापर कधीही करणार नाही. जगाच्या पाठीवर कुठं ही फक्त दोन सामान्य क्षमतेचे अणुस्फोट झाले तरी सत्तर टक्के जगावरील ओझोन थर नष्ट होईल ह्याची जाणीव जिनपिंग पासून इमरान खान पर्यंत आणि हाफिज सईद पासून आयसिस किम झोन्ग पर्यंत सर्वाना आहे (काही उथळ लोकांना नाही तो भाग वेगळा!).

भारत चीन संघर्षात भारताला न भरून येणारे नुकसान होईल का? ह्याचे उत्तर नाही असे आहे. आज फक्त तंत्रज्ञान सोडले तर बाकी सर्व बाबतीत आपण चीन समोर तुल्यबळ आहोत आणि निर्धाराच्या बाबतीत चीनच्या शतपटीने पुढं आहोत.

भारत महासत्ता बनेल का? ह्याचे उत्तर होय असे आहे. महासत्ता शब्दाची व्याख्या अनेक प्रकारे करता येते. जागतिक राजकारणात आपला दबदबा आणि वर्चस्व राखणे ही महासत्ता असण्याची चीन व रशिया
ची व्याख्या असेल तर ह्यानुसार भारत २०२४-२५ पर्यंत जगात महासत्ता असेल.

येणारा काळ सर्वसामान्य भारतीय नागरिकांसाठी थोडा अडचणीचा असू शकतो का? ह्याचे उत्तर होय असे आहे. सगळे जग अडचणीत आहे. त्यात आपल्या देशासमोर काही जुने वाद व प्रश्न तोंड काढून उभे राहिल्याने ते कायमचे मिटवायचे असतील तर आपल्या सर्वांना पुढील किमान आठ महिने थोडी कळ सोसावी लागेल.

भारतीय लष्कर पाकिस्तान किंवा चीन सोबतच्या संघर्षासाठी तयार आहे का? ह्याचे उत्तर होय असे आहे. भारतीय लष्कर कायमच सर्व गोष्टींसाठी तयार असते. पाकिस्तान, नेपाळ सारख्या देशांच्या सोबत आपल्या लष्कराची तुलना करून हा भारतीय लष्कराचा अपमान ठरेल.

भारत चीन व्यापार पूर्णपणे बंद होऊ शकतो का? ह्याचे उत्तर नाही असे आहे. अर्थात सरकार अतिशय जबरी कर लावून चिनी उत्पादने महाग बनवू शकते. त्यात सर्व भारतीय नागरिकांनी जर चिनी उत्पादनांच्या वर बहिष्कार घालायचे ठरवले तर मग हा व्यापार अगदी नगण्य बनून जाईल ज्याचा चीनला मोठा आर्थिक फटका बसेल.

रामदेव बाबांच्या बहुचर्चित कोरोनील ह्या कोरोनावरील औषधावर शंका घेणे योग्य आहे का? ह्याचे उत्तर नाही असे आहे. कोणतेही औषध प्रमाणित झाल्याशिवाय बाजारात येत नाही. रामदेव बाबांच्या औषधाची किंमत सहाशे रुपये आहे तर इतर कंपन्यांच्या समांतर औषधाची किंमत दहा हजारांच्या वर जाते. औषध विक्री क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा दबदबा आणि वर्चस्व असताना रामदेव बाबांनी भारताचा झेंडा अतिशय धाडसी पणे रोवला आहे ह्याचे खरे तर कौतुक असायला हवे.

चीन चर्चेच्या आडून युद्धाची तयारी करतोय का? ह्याचे उत्तर होय असे आहे. गेल्या तीन दिवसात चीनने कुणाचाही अधिकृत भूभाग नसलेल्या सीमेवरील जमिनीवर सगळे करार मोडून आपले बंकर व सशस्त्र तळ बनवायला सुरुवात केलीय.

चीन भारता आधी जपान वर हल्ला करेल का? ह्याचे सध्याच्या घडीस नाही असे उत्तर आहे.हिरोशिमा नागासाकी घटने नंतर अमेरिकेने एका कराराद्वारे जपानच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आहे.जपान वर हल्ला हा थेट अमेरिकेवर हल्ला समजला जाईल. जपान व अमेरिका अतिप्रगत देश असल्याने चीन ते पाऊल उचलायच्या आधी दहा वेळा विचार करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत आहेत ह्याचा अर्थ त्यांनी माघार घेतलीय असा घ्यायचा का? ह्याचे उत्तर नाही असे आहे.नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा शांत राहिले तेव्हा-तेव्हा उत्तरात सर्जिकल तसेच हवाई हल्ले झाले आहेत. मोदी कृतीने उत्तर देण्यावर विश्वास ठेवतात.

१९६२ च्या युद्धात चीन ने भारताला हरवलेले आहे. जसा भारत १९६२ चा राहिला नाही तसेच चीन ही राहिला नाही हे आपण लक्षात घ्यावे का? ह्याचे उत्तर नाही असे आहे. १९६२ ला ही आपण चिनला हरवू शकत होतो. हिंदी-चिनी भाई-भाई म्हणून चीनने कसलीच सूचना न देता सरळ आक्रमण केले.

पाकिस्तान ह्या कठीण समयी भारतावर हल्ला करेल का? ह्याचे उत्तर होय असे आहे. पण ती संधी भारत सरकार पाकिस्तानला देणार नाही. भारताने पाकिस्तान सीमेवर याआधीच आपली अत्याधुनिक क्षेपणास्त्रे तैनात आहेत ज्याची पाकिस्तानला कल्पना आहे त्यामुळे पाकिस्तान सध्या बघ्याची भूमिका घेईल.

रशियाची येत्या काळात भारत विरोधी भूमिका असेल का? ह्याचे उत्तर नाही असे आहे. रशिया हा भारत व चीन असे दोघांचाही मित्र असला तरीही रशिया निवड करायची वेळ येईल तेव्हा निसंदिग्ध पणे भारताची निवड करेल. ती का करेल ह्यावर पुढच्या लेखात सविस्तर लिहितो.

मी काही रक्षातज्ञ वगैरे नाही पण माझे एक मार्गदर्शक रक्षा तज्ञ आहेत. चीन सोबत माझ्यासह आमच्या व्यावसायिक साखळी चे व्यावहारिक संबंध होते त्यामुळे चीन विषयी पूर्ण नसली तरी किमान माहिती व अभ्यास मात्र माझा निश्चितच आहे.अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करा साध्या भाषेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन.

जय हिंद
लेखक : रोहित पुंक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना त्वरित खत मिळाले नाही तर कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, सिल्लोड भाजपचा निवेदनाद्वारे इशारा

सिल्लोड : उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात युरिया त्वरित उपलब्ध करावा ...

लोकप्रिय बातम्या व लेख