मंगळवार, २ जून, २०२०

Corona update : जिल्ह्यात आज ५५ रुग्णांची वाढ, ५१४ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, ता. ०२ : औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता. दोन) सकाळी आलेल्या अहवालात ५५ जण पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याने कोरोनाबाधितांचा आकडा १६४२ झाला आहे. यापैकी १०४९ कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून ७९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सध्या ५१४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

दोन जूनला सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. शहा बाजार (०१), किराडपुरा (०२), चंपा चौक (०१), कटकट गेट (०१), नारळीबाग (०१), गणेश कॉलनी (०१), जवाहर नगर (०३), भीम नगर (०२), हमालवाडी (०१), शिवशंकर कॉलनी (०२), नाथ नगर (०२), ज्योती नगर (०१), फजलपुरा परिसर (०१), मिल कॉर्नर (०१), एन-३ सिडको (०१), एमजीएम परिसर (०१), रोशन गेट (०१) , विशाल नगर, गारखेडा परिसर (०१), एन-सहा संभाजी कॉलनी (०७), समता नगर (०५), अंहिसा नगर (०१), मुकुंदवाडी (०१), विद्या निकेतन कॉलनी (०१), न्याय नगर (०१), बायजीपुरा (०२), संजय नगर, मुकुंदवाडी (०४), विजय नगर (०२), यशवंत नगर, पैठण (०१), चंपा चौक, म्हाडा कॉलनी (०१), नेहरु नगर (०१), जुना मोंढा नाका परिसर (०१), इतर ठिकाणी (०३) या भागात कोरानाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये २४ महिला आणि ३१ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

मृतांची संख्या ७९

औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये खिवंसरा पार्क, गारखेडा परिसरातील कोरोनबाधित असलेल्या ६४ वर्षीय पुरूष रुग्णाचा एक जून रोजी रात्री ११.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ६३, तीन खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १५, मिनी घाटीमध्ये ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण ७९ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना त्वरित खत मिळाले नाही तर कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, सिल्लोड भाजपचा निवेदनाद्वारे इशारा

सिल्लोड : उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात युरिया त्वरित उपलब्ध करावा ...

लोकप्रिय बातम्या व लेख