मंगळवार, ९ जून, २०२०

शेतकऱ्यांचा शेतीमाल लालपरी पोचविणार थेट बाजारपेठेपर्यंत सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी येथुन शुभारंभ

एसटी महामंडळाचा स्तुत्य उपक्रम

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी येथून एस. टी. महामंडळाच्या मालवाहतुक ट्रकच्या वाहतुकाचा शुभारंभ करताना भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील मोठे, आगारप्रमुख प्रविण भोंडवे आदी.

औरंगाबाद : शेतकरी व व्यापारी वर्गाला शेतमाल बाजार पेठेपर्यंत पोचविणे आता सोयीचे ठरणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने शेतीमाल वाहतूक ट्रकची सुरुवात रविवारी (ता. सात) सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी येथे करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांच्या हस्ते या मालवाहतुक ट्रक वाहतुक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 

 

या वेळी आगारप्रमुख प्रवीण भोंडवे, स्थानक तथा मालवाहतूक प्रमुख व्ही. बी. चव्हाण, वाहतूक निरीक्षक जि. ए. गवारे, वाहतूक निरीक्षक यस. एल. भापकर, वाहतूक नियंत्रक बाबासाहेब साळुंके, वाहतूक नियंत्रक राहुल राऊत यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत होती. तालुक्यातून बोरगाव कासारी ते शेकटा पहिली शेतीमालाची खेप जाणार आहे. एस. टी. महामंडळ याचे भाडे अंदाजे ४८ रुपये प्रति क्विंटल आकारणार असल्याने वाहतुकीचा खर्च कमी लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेती माल बाजारपेठेपर्यंत पोचविणे सोयीचे होणार आहे. व्यापारी वर्गांना सुद्धा याचा लाभ घेता येणार असून, त्यामुळे व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्तीचा भाव देऊ शकणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात महामंडळालाही भाड्याच्या स्वरूपात फायदा होईल. या मालवाहतुकीच्या निर्णयांमुळे व्यापारी व शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होत आहे. या प्रसंगी महामंडळाच्या ट्रकमध्ये शेतकऱ्यांचा माल सुरक्षीत राहील याची ग्वाही देतांनाच महामंडळाच्यावतीने माल वाहतुक सेवा अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिली जात आहे. याचा सर्वच शेतकरी वर्गांसह छोटे मोठ्या व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रवीण कोंडवे यांनी यावेळी बोलताना केले.

या कार्यक्रमाला एस. टी. महामंडळाचे चालक भारत खरोडे, सुधाकर गोराडे, संजय आघाडे, रामभाऊ मगर वाहक पोपट वाढेकर आदी कर्मचाऱ्यांसह शेतीमाल व्यापारी सोपान गोराडे, माजी उपसरपंच दादाराव ब्राह्मणे, शेतकरी व ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय

पिकवणे सोपे पण विकणे अवघड अशा परीस्थितीमुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल वेळेवर व सुलभरित्या बाजारपेठेपर्यंत पोचविणे जिकरीचे असल्यामुळे जागेवरच व्यापाऱ्यांना कमी भावात शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते अशावेळी शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठे अर्थिक नुकसान सहन करावे लागते. मात्र महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा शेतीमाल गावातुन थेट बाजार पेठेपर्यंत किंवा तत्सम ठिकाणी पोच करणार असल्याने शेतकऱ्यांची दोन पैशाची बचत होऊन शेतमाल थेट बाजारपेठेपर्यंत जाणार असल्याने याचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. एस. टी. महामंडळाने घेतलेल्या या मालवाहुतीकीच्या निर्णयाचे शेतकऱ्यांमधुन कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना त्वरित खत मिळाले नाही तर कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, सिल्लोड भाजपचा निवेदनाद्वारे इशारा

सिल्लोड : उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात युरिया त्वरित उपलब्ध करावा ...

लोकप्रिय बातम्या व लेख