शनिवार, ६ जून, २०२०

मुंबईची अवस्था पाहून मुंबई सोडून नांदेड गाठले-अशोक चव्हाण


मुंबई : मुंबईत कोरोनाची अवस्था पाहून मी मुंबई सोडण्याचा निर्णय घेत नांदेडला जाण्याचा निर्णय  घेतला होता असे काँग्रेसचे वरीष्ठ नेते माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ब्रिच कँडी रुग्णालयात अकरा दिवस उपचार केल्यानंतर बरे होऊन त्यांनी कोरोनावर मात केली. त्यांना चार जुनला सुट्टी देण्यात आली.

कॉंग्रेसचे वरीष्ठ नेते व सार्वजनिक बांधाकाम मंत्री अशोक चव्हाण यांना नांदेडला कोरोना पॉझिटीव्ह झाल्यानंतर ते उपचारासाठी नांदेडहुन मुंबईला आले होते. त्यांनतर त्यांनी सांगितले की, मुंबईला माझ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचा पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर मी विचलित झालो व ही परीस्थिती कुठपर्यंत पोचली. मुंबईत ज्या गतीने कोरोना वाढत चालला आहे त्यामुळे नांदेडला स्वतःच्या घरीच थांबाव यासाठी 19 जूनला मुख्यमंत्र्यांना सकाळी भेटून मी मुंबई सोडून नांदेडला जाण्याचा निर्णय घेतला व नांदेडला गेल्यानंतर मी चार दिवस होम कॉरंन्टाईन झालो. त्यानंतरही मला कोणतेही लक्षणे दिसत नव्हते ताप, सर्दी, खोकला यासारखे काहीही नव्हते मात्र मी फॅमिली डॉक्टरांना माझ्या नोकरांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले त्यामुळे त्यांनी मला तपासण्या करुण घेण्याचा सल्ला दिल्यानंतर तपासण्या यावेळी एक्सरे काढले त्यात संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्यावर मुंबई येथील ब्रिच कँडी रुग्णालयात अकरा दिवस उपचार करण्यात आले.

यापुढे सर्वांनी खुप काळजी घ्यावी

मला या अकरा दिवसाच्या काळात खुप काही शिकायला मिळाले. आपण या गोष्टी दुसऱ्याला सांगतो बाहेर पडू नका घरीच थांबा मात्र जेव्हा स्वतःवर ही वेळ येते तेव्हा कळते. त्यामुळे सरकार देत असलेल्या सुचनांचे पालन करावे हा आजार मी खुप जवळून पाहीला आहे. त्यामुळे यापुढे कामाच्या पद्धतीत बदल करावा लागणार आहे. काम करु नका असे करता येणार नाही. यापुढे खुप काळजी घ्यावी लागणार आहे. या काळात नांदेडमध्ये एकही रुग्ण नव्हता तेव्हा अनेकजण माझे अभिनंदन केले. पण मला काळजी वाटत होती. पुढे काय होते हे सांगता येत नाही. नांदेडला स्थानिक नागरीकांमधून ही साथ पसरली नाही असेही ते म्हणाले.

कोरोनावर केली मात

कोरोनाच्या काळात मंत्री अशोकराव चव्हाण मतदारसंघात खुप फिरुण गरजवंताना मदत करणे असो की मुंबईत विविध बैठका असो त्यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर कोरोनाचा संसर्ग होणारे अशोक चव्हाण हे राज्यातील दुसरे मंत्री आहेत. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णवाहीकेतून नांदेडहून मुंबईला हलविण्यात आले होते. मुंबईत येथील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचारानंतर अकरा दिवसांनी त्यांनी कोरोनावर मात केली आहे. दोन दिवसापुर्वी म्हणजेच चार जुन रोजी त्यांना कोरोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

रुग्णालयातून स्पीकअप इंडीया मोहीमेत सहभाग


रुग्णालयात असतानाही अशोक चव्हाण हे एक्टीव्ह मोड मध्येच पहायला मिळाले यावेळी त्यांनी केलेल्या व्हिडीओत ते ते म्हणाले की, मित्र हो नमस्कार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाद्रा यांनी जी स्पीकअप इंडीया मोहीम हाती घेतलेली आहे. त्यात मी सहभाग नोंदवत आहे. कोट्यावधी देशवासियांचे जे मनोगत आहे. ज्यांचा आवाज बुलंद करण्याच्या दृष्टीकोनातून आज मी मुंबईतल्या एका हॉस्पिटलमधून कोरोनाशी लढा देत असताना स्पीकअप इंडीया मोहीमेत सहभागी होत असल्याचं जाहीर करतो. यावेळी त्यांनी त्यांचा तो व्हीडीओ ट्विटरवर शेअर केला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना त्वरित खत मिळाले नाही तर कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, सिल्लोड भाजपचा निवेदनाद्वारे इशारा

सिल्लोड : उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात युरिया त्वरित उपलब्ध करावा ...

लोकप्रिय बातम्या व लेख