रविवार, १४ जून, २०२०

भारत विरोधी भूमिकेमुळे नेपाळी सरकार विरुद्ध जनतेत रोष नकाशावरून देशभरात निदर्शने


काठमांडू : नेपाळी सरकार देशात अनेक आघाड्यांवर अपयशी ठरलेल्यामुळे नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी आपले अपयश झाकण्यासाठी व आपली खुर्ची वाचवण्यासाठी नवीन नकाशामध्ये भारतातील तीन क्षेत्रे समाविष्ट करून ती नेपाळची अस्मिता व राष्ट्रवादाचा मुद्दा बनविला आहे.

नेपाळच्या नागरिकांचा या गोष्टीला विरोध दिसून येत आहे. बेरोजगारी आणि कोरोनाचा सामना करण्यास असमर्थ ठरलेले ओली सरकार या सर्व बाबींवरुन जनतेचे लक्ष हटविण्यासाठी भारताशी संबंध बिघडविण्याचे काम सरकार करीत असल्याचे जनतेला मत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि नेपाळ यांच्यात सुमधुर संबंध आहेत. आता नेपाळच्या नवीन नकाशावरुन जनता त्यांच्याच सरकारविरूद्ध रस्त्यावर उतरली आहे.

राजधानी काठमांडू आणि नेपाळमधील इतर अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन तोडून लोक रस्त्यावर उतरून सरकारविरोधी निषेध सुरू केला आहे. केपी शर्मा ओली यांचे सरकार त्यांच्याच घरात या निदर्शनांनी घेरले गेले आहे. पंतप्रधान म्हणून केपी शर्मा यांची लोकप्रियता झपाट्याने कमी होत आहे. त्यांच्या पक्षातील गटबाजीही शिगेला पोहोचली आहे. कोरोनाविरूद्ध युद्धात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही केपी ओली शर्मा सरकारला होत आहे. विरोधी पक्ष सरकारला कोरोना युद्धात होणाऱ्या खर्चाचा हिशोब मागत आहे.

या निदर्शनाबद्दल सरकारने संताप व्यक्त केला आहे, नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ज्ञवाली यांनी शुक्रवारी रात्री मीडियाच्या माध्यमातून जनतेने हे प्रदर्शन थांबवावे असे आवाहन केले. नेपाळच्या जनतेला त्यांनी आवाहन केले की अशा वातावरणात जेव्हा नवीन नकाशाला घटनात्मक दर्जा देण्याची तयारी चालू असताना नागरिकांनी प्रदर्शन करू नये. यामुळे नेपाळबद्दल जगभरात चुकीचा संदेश जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना त्वरित खत मिळाले नाही तर कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, सिल्लोड भाजपचा निवेदनाद्वारे इशारा

सिल्लोड : उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात युरिया त्वरित उपलब्ध करावा ...

लोकप्रिय बातम्या व लेख