केंद्रीयमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यात जे काही कौटुंबिक वाद आहेत त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही. डॅशिंग नेता म्हणून हर्षवर्धन जाधव यांचे कौतुक होत असताना काल मात्र आपल्या कुटुंबातील वाद असा नाटकीयरित्या व्हिडिओ बनवून जगाच्या चव्हाट्यावर आणून जाधव यांनी स्वतःचीच इज्जत कमी करून घेतली आहे. महाराष्ट्र जेवढा रावसाहेब दानवे यांना ओळखतो त्यावरून ते सहानुभूतीसाठी केलेल्या स्टंटला काही भडक प्रतिक्रिया देतील असे वाटत नाही.
ज्यावेळी अजित दादांनी केवळ एक दिवस आपला पक्ष न सोडता बंड केले होते त्यावेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर पार घसरलेली जंत पिलावळ आज सकाळपासून ह्या विषयावर मात्र चवीने बोलत आहे. एवढा निर्लज्जपणा आणता कुठून बाबांनो? काय तो तुम्हाला तुमचे जाणते साहेबच पुरवतात?
वाद प्रत्येक पक्षातील बऱ्याच राजकीय कुटुंबांमध्ये आहेत मात्र ठळक व प्रमुख व्यक्तींच्या घरातले वाद जरा जास्त चवीने व त्या वादाशी काडीमात्र संबंध नसलेले लोकच जास्त चघळतात. स्वतःला 'जबाबदार' वगैरे म्हणवून घेणाऱ्या समाजाचे हेच काय ते वास्तव आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला कोणताही कौटूंबिक वारसा नसताना ते स्वकर्तुत्वावर लोकप्रिय झाले आहेत. संघर्षातून वर आल्याने सामाजिक वास्तवाचे त्यांना भान आहे. किती ही मीम बनविले किंवा चेष्टा होत असली तरी रावसाहेब दानवे हे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेत हे नाकारता येत नाही.
जय हिंद
-----------
लेखक - रोहित पुंक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा