औरंगाबाद, ता. २५ : कोरोना पॉझिटीव्ह झाल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे पुढील उपचारासाठी नांदेडहून मुंबईला गेल्याने सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला आहे.
अशोकराव चव्हाण हे राज्यातील कॉंग्रेसचे वजनदार नेते म्हणून ओळखल्या जातात. गांधीघराण्याशी जवळचे संबध असल्याने राज्याचे मुख्यमंत्री, खासदार, आघाडी सरकारच्या काळात महसुल मंत्री, उद्योग आणि सांस्कृतिकमंत्री आणि आता सहा महिन्यांपासून सत्तेत आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी असताना नांदेडमध्ये व्यवस्थित उपचार होतील अशी व्यवस्था ते उभारू शकले नाही ह्याची त्यांना खात्री आहे?
तर मग सर्वसामान्य नांदेडकरांनी कोणत्या भरवशावर तिथे उपचार करावे अशा पोस्ट सध्या समाज माध्यमात फिरत आहेत. तर ही राजकारण करण्याची वेळ नाही. 'साहेब तुम्ही लवकर बरे व्हा... अशा पोस्ट सुद्धा फिरत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा