नवी दिल्ली, ता. २७ : दहावी-बारावीच्या राहीलेल्या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक सीबीएसई बोर्ड जुनच्या पहील्या आठवड्यात जाहीर करणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊन मुळे जे विद्यार्थी आपल्या गृह जिल्हा किंवा राज्यात गेले आहेत त्यांना आहे त्याच जिल्ह्यात परीक्षा देण्याची सवलत मिळणार असल्याची माहीती केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल "निशंक" यांनी दिली.
कोरोनामुळे सर्वच शाळांच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या त्याप्रमाणे सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुद्धा लांबणीवर पडल्या होत्या. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती असल्यामुळे बोर्डाच्या परीक्षा होतील की नाही या चिंतेत असलेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. याबाबत सीबीएसई बोर्डाने सुचना मागविल्या होत्या. आलेल्या सुचनांनुसार बाहेरगावी गेलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करुन केंद्रीय बोर्डाने विद्यार्थी आहे त्याच जिल्ह्यात परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला माहीती देऊन आपण आहे त्या जिल्ह्यात परीक्षा देऊ ईच्छितो याबद्दल सीबीएसई बोर्ड निर्णय घेईल व जुनच्या पहील्या आठवड्यात याबद्दल विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ठिकाणाची माहीती मिळेल असेही श्री. पोखरीयाल यांनी सांगितले. या परीक्षा १ ते १५ जुलैच्या मध्ये होण्याची शक्यता आहे.











