बुधवार, २४ जून, २०२०

भारत-चीन युद्धाची शक्यता आहे का? होय शक्यता आहे. कसे ते वाचा


भारत चीन युद्धाची शक्यता आहे का? ह्याचे उत्तर होय असे आहे. नक्कीच शक्यता आहे.

भारत-चीन किंवा भारत-पाक अणुयुद्ध होईल का? ह्याचे उत्तर नाही असे आहे. जगातील कोणताही देश किंवा अतिरेकी संघटना अणुबॉम्ब चा वापर कधीही करणार नाही. जगाच्या पाठीवर कुठं ही फक्त दोन सामान्य क्षमतेचे अणुस्फोट झाले तरी सत्तर टक्के जगावरील ओझोन थर नष्ट होईल ह्याची जाणीव जिनपिंग पासून इमरान खान पर्यंत आणि हाफिज सईद पासून आयसिस किम झोन्ग पर्यंत सर्वाना आहे (काही उथळ लोकांना नाही तो भाग वेगळा!).

भारत चीन संघर्षात भारताला न भरून येणारे नुकसान होईल का? ह्याचे उत्तर नाही असे आहे. आज फक्त तंत्रज्ञान सोडले तर बाकी सर्व बाबतीत आपण चीन समोर तुल्यबळ आहोत आणि निर्धाराच्या बाबतीत चीनच्या शतपटीने पुढं आहोत.

भारत महासत्ता बनेल का? ह्याचे उत्तर होय असे आहे. महासत्ता शब्दाची व्याख्या अनेक प्रकारे करता येते. जागतिक राजकारणात आपला दबदबा आणि वर्चस्व राखणे ही महासत्ता असण्याची चीन व रशिया
ची व्याख्या असेल तर ह्यानुसार भारत २०२४-२५ पर्यंत जगात महासत्ता असेल.

येणारा काळ सर्वसामान्य भारतीय नागरिकांसाठी थोडा अडचणीचा असू शकतो का? ह्याचे उत्तर होय असे आहे. सगळे जग अडचणीत आहे. त्यात आपल्या देशासमोर काही जुने वाद व प्रश्न तोंड काढून उभे राहिल्याने ते कायमचे मिटवायचे असतील तर आपल्या सर्वांना पुढील किमान आठ महिने थोडी कळ सोसावी लागेल.

भारतीय लष्कर पाकिस्तान किंवा चीन सोबतच्या संघर्षासाठी तयार आहे का? ह्याचे उत्तर होय असे आहे. भारतीय लष्कर कायमच सर्व गोष्टींसाठी तयार असते. पाकिस्तान, नेपाळ सारख्या देशांच्या सोबत आपल्या लष्कराची तुलना करून हा भारतीय लष्कराचा अपमान ठरेल.

भारत चीन व्यापार पूर्णपणे बंद होऊ शकतो का? ह्याचे उत्तर नाही असे आहे. अर्थात सरकार अतिशय जबरी कर लावून चिनी उत्पादने महाग बनवू शकते. त्यात सर्व भारतीय नागरिकांनी जर चिनी उत्पादनांच्या वर बहिष्कार घालायचे ठरवले तर मग हा व्यापार अगदी नगण्य बनून जाईल ज्याचा चीनला मोठा आर्थिक फटका बसेल.

रामदेव बाबांच्या बहुचर्चित कोरोनील ह्या कोरोनावरील औषधावर शंका घेणे योग्य आहे का? ह्याचे उत्तर नाही असे आहे. कोणतेही औषध प्रमाणित झाल्याशिवाय बाजारात येत नाही. रामदेव बाबांच्या औषधाची किंमत सहाशे रुपये आहे तर इतर कंपन्यांच्या समांतर औषधाची किंमत दहा हजारांच्या वर जाते. औषध विक्री क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा दबदबा आणि वर्चस्व असताना रामदेव बाबांनी भारताचा झेंडा अतिशय धाडसी पणे रोवला आहे ह्याचे खरे तर कौतुक असायला हवे.

चीन चर्चेच्या आडून युद्धाची तयारी करतोय का? ह्याचे उत्तर होय असे आहे. गेल्या तीन दिवसात चीनने कुणाचाही अधिकृत भूभाग नसलेल्या सीमेवरील जमिनीवर सगळे करार मोडून आपले बंकर व सशस्त्र तळ बनवायला सुरुवात केलीय.

चीन भारता आधी जपान वर हल्ला करेल का? ह्याचे सध्याच्या घडीस नाही असे उत्तर आहे.हिरोशिमा नागासाकी घटने नंतर अमेरिकेने एका कराराद्वारे जपानच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आहे.जपान वर हल्ला हा थेट अमेरिकेवर हल्ला समजला जाईल. जपान व अमेरिका अतिप्रगत देश असल्याने चीन ते पाऊल उचलायच्या आधी दहा वेळा विचार करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत आहेत ह्याचा अर्थ त्यांनी माघार घेतलीय असा घ्यायचा का? ह्याचे उत्तर नाही असे आहे.नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा शांत राहिले तेव्हा-तेव्हा उत्तरात सर्जिकल तसेच हवाई हल्ले झाले आहेत. मोदी कृतीने उत्तर देण्यावर विश्वास ठेवतात.

१९६२ च्या युद्धात चीन ने भारताला हरवलेले आहे. जसा भारत १९६२ चा राहिला नाही तसेच चीन ही राहिला नाही हे आपण लक्षात घ्यावे का? ह्याचे उत्तर नाही असे आहे. १९६२ ला ही आपण चिनला हरवू शकत होतो. हिंदी-चिनी भाई-भाई म्हणून चीनने कसलीच सूचना न देता सरळ आक्रमण केले.

पाकिस्तान ह्या कठीण समयी भारतावर हल्ला करेल का? ह्याचे उत्तर होय असे आहे. पण ती संधी भारत सरकार पाकिस्तानला देणार नाही. भारताने पाकिस्तान सीमेवर याआधीच आपली अत्याधुनिक क्षेपणास्त्रे तैनात आहेत ज्याची पाकिस्तानला कल्पना आहे त्यामुळे पाकिस्तान सध्या बघ्याची भूमिका घेईल.

रशियाची येत्या काळात भारत विरोधी भूमिका असेल का? ह्याचे उत्तर नाही असे आहे. रशिया हा भारत व चीन असे दोघांचाही मित्र असला तरीही रशिया निवड करायची वेळ येईल तेव्हा निसंदिग्ध पणे भारताची निवड करेल. ती का करेल ह्यावर पुढच्या लेखात सविस्तर लिहितो.

मी काही रक्षातज्ञ वगैरे नाही पण माझे एक मार्गदर्शक रक्षा तज्ञ आहेत. चीन सोबत माझ्यासह आमच्या व्यावसायिक साखळी चे व्यावहारिक संबंध होते त्यामुळे चीन विषयी पूर्ण नसली तरी किमान माहिती व अभ्यास मात्र माझा निश्चितच आहे.अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करा साध्या भाषेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन.

जय हिंद
लेखक : रोहित पुंक

रविवार, १४ जून, २०२०

भारत विरोधी भूमिकेमुळे नेपाळी सरकार विरुद्ध जनतेत रोष नकाशावरून देशभरात निदर्शने


काठमांडू : नेपाळी सरकार देशात अनेक आघाड्यांवर अपयशी ठरलेल्यामुळे नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी आपले अपयश झाकण्यासाठी व आपली खुर्ची वाचवण्यासाठी नवीन नकाशामध्ये भारतातील तीन क्षेत्रे समाविष्ट करून ती नेपाळची अस्मिता व राष्ट्रवादाचा मुद्दा बनविला आहे.

नेपाळच्या नागरिकांचा या गोष्टीला विरोध दिसून येत आहे. बेरोजगारी आणि कोरोनाचा सामना करण्यास असमर्थ ठरलेले ओली सरकार या सर्व बाबींवरुन जनतेचे लक्ष हटविण्यासाठी भारताशी संबंध बिघडविण्याचे काम सरकार करीत असल्याचे जनतेला मत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि नेपाळ यांच्यात सुमधुर संबंध आहेत. आता नेपाळच्या नवीन नकाशावरुन जनता त्यांच्याच सरकारविरूद्ध रस्त्यावर उतरली आहे.

राजधानी काठमांडू आणि नेपाळमधील इतर अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन तोडून लोक रस्त्यावर उतरून सरकारविरोधी निषेध सुरू केला आहे. केपी शर्मा ओली यांचे सरकार त्यांच्याच घरात या निदर्शनांनी घेरले गेले आहे. पंतप्रधान म्हणून केपी शर्मा यांची लोकप्रियता झपाट्याने कमी होत आहे. त्यांच्या पक्षातील गटबाजीही शिगेला पोहोचली आहे. कोरोनाविरूद्ध युद्धात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही केपी ओली शर्मा सरकारला होत आहे. विरोधी पक्ष सरकारला कोरोना युद्धात होणाऱ्या खर्चाचा हिशोब मागत आहे.

या निदर्शनाबद्दल सरकारने संताप व्यक्त केला आहे, नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ज्ञवाली यांनी शुक्रवारी रात्री मीडियाच्या माध्यमातून जनतेने हे प्रदर्शन थांबवावे असे आवाहन केले. नेपाळच्या जनतेला त्यांनी आवाहन केले की अशा वातावरणात जेव्हा नवीन नकाशाला घटनात्मक दर्जा देण्याची तयारी चालू असताना नागरिकांनी प्रदर्शन करू नये. यामुळे नेपाळबद्दल जगभरात चुकीचा संदेश जात आहे.

शुक्रवार, १२ जून, २०२०

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष सुनील पाटील मिरकर यांच्या वाढदिवसानिमित्त ५४ रक्तदात्यांनी केले रक्तदान गरीब कुटूंबाला दिला मदतीचा हात

सिल्लोड : भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल पाटील मिरकर यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब कुटूंबाला मदत करताना. 
औरंगाबाद, ता. १२ : भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल पाटील मिरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले कोरोणाच्या जागतिक महामारीमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे सुनील मिरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथील संपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
वृक्षारोपण करताना भाजपचे नेते सुरेश बनकर, ज्ञानेश्वर पाटील मोठे, इद्रिस मुलतानी, विनोद मंडलेचा, कमलेश कटारिया, मनोज मोरेल्लू, मधुकर राऊत आदी
कोरोना व्हायरसमुळे अनेकांच्या हाताचा रोजगार गेल्यामुळे सिल्लोड शहरातील गोरगरीब धुणीभांडी करणाऱ्या 37 महिलांना एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य किराणा सामानाची किट गहू, तांदूळ, साखर, तेल, दाळ, शेंगदाणे, मिठ, मसाला या घरगुती साहीत्यांसह सॅनिटायजर व मास्क चे वाटप सोशल डिसटिंगचे पालन करून करण्यात आले. वाढदिवसानिमित्त स्वतः सुनील मिरकर यांनी रक्तदान करून उद्घाटन केले. सिल्लोड शहरातील आरएल पार्क येथे  वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश पाटील बनकर, भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील मोठे, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इद्रिस मुलतानी, भाजपा शहराध्यक्ष विनोद मंडलेचा, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस कमलेश कटारिया, नगरसेवक मनोज मोरेल्लू, भाजयुमो शहराध्यक्ष मधुकर राऊत, माजी पंचायत समिती सदस्या सौ. वृषाली सुनिल मिरकर यांच्यासह तालुका व शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वत:च्या वाढदिवशी रक्तदान करताना सुनिल पाटील मिरकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी.

रक्तदान शिबिरात स्वतःच्या वाढदिवशी रक्तदान करुन एक आदर्श घालुन दिला. यावेळी नितीन शिंगारे, महेश खैरे, अजय नेमाने, रोहित गवते, संतोष वानखेडे, ऋषिकेश लुटे, अक्षय खंडाळे, तुषार इंगळे, आनंद शेळके, संदीप इंगळे, आकाश आरके, श्रावण दुधे, संदीप कौसल, अमोल कारले, आजिनाथ काकडे, उदयकुमार देशमुख, रवी जाधव, आकाश कुमावत, प्रवीण ढाकरे, योगेश साळवे, नारायण पुरी, स्वप्नील शिंगारे, आशिष कर्नावट, योगेश सोनवणे, राहुल राऊत, योगेश पवार, ईश्वर कर्नावट, विशाल मुरकुटे, अक्षय सूर्यवंशी, लक्ष्मण गोरे, संजय गारखेडे, रोहित मिरकर, प्रवीण मिरकर, राहुल राऊत, स्वप्नील साळुंके, सचिन साळवे, सचिन जाधव, राहुल मिरकर, ऋतिक आहेर, सचिन मिरकर, प्रकाश झलवार, गौरव वराडे, अज्जू शहा, अतुल साळवे, रवी जाधव, पवन सोनवणे आदी दात्यांनी रक्तदान करून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले संभाजीनगर येथील दत्ताजी भाले रक्तपेढीने रक्त संकलन केले.

बुधवार, १० जून, २०२०

भारतीय वायुदलाच्या विमानांच्या कराची शहरावरुन घिरट्या? पाकचा इन्कार, बालाकोट एअर स्ट्राईकची आठवण ताजी

कराची : भारतीय वायुदलाच्या विमानांनी काल मध्यरात्री पाकीस्तानच्या कराची शहरावरुन घिरट्या मारल्यामुळे संपुर्ण कराची शहराचा वीजपुरवठा खंडीत करुन कराची शहर अचानक ब्लॅक आऊट करण्यात आले. त्यानंतर पाकीस्तानी विमानांनी कराची शहरावर गस्त घातल्यामुळे पाकीस्तानी सैन्यांसह नागरीकांची झोप उडाली आहे.

याबाबत माहीती अशी की, पाकिस्तानच्या कराचीमध्ये एक अफवा पसरली की काल मध्यरात्री कराची शहरावरुन काही विमानांनी घिरट्या घातल्या त्यामुळे तेथील सैन्याची झोप उडाली आहे. त्यानंतर संपूर्ण कराची शहराची वीज तोडण्यात आली व पाकीस्तानची सैनदलाची विमानांनी काही काळ शहरावरुन गस्त घातल्याचे समजते. यामुळे पाकीस्तानी नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बालाकोटची आठवण ताजी

भारताने पाकीस्तानी अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी पाक अधिकृत काश्मिरमधील बालाकोट एअर स्ट्राईक केला होता. त्यावेळी सुद्धा काहीतरी घडल्याची पहीली बातमी पाकीस्तानमधून आली होती. त्यावेळी पाकीस्तानने अशा स्ट्राईकचा सुरवातीला इन्कार केला व नंतर कबुली देताना जंगलातील काही झाडे कोसळल्याची प्रतिक्रिया देऊन झालेली नामुष्की झाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीप्रमाणे आतासुद्धा भारताकडून या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र केवळ एका अफवेवर विश्वास ठेऊन पाकीस्तानने कराची शहराचा वीजपुरवठा खंडीत करुन ब्लॅकआऊट केल्यामुळे काहीतरी घडल्याचा सुर नागरीकांमध्ये दिसुन येत असुन भीतीचे वातावरण पसरले आहे

कराची शहर

पाकिस्तानमध्ये या अफवांमुळे तेथील सैन्य आणि सामान्य नागरिकांची झोप उडाली आहे. संपूर्ण कराची शहर ब्लॅकआउट करण्यापर्यंत परिस्थिती आल्याची माहीती मिळते. वास्तविक सोशल मीडियावर अशी अफवा पसरली होती की काही अज्ञात लढाऊ विमान कराचीवरून उड्डाण करतांना दिसत आहे. तेव्हाच काय, पाकिस्तानची लढाऊ विमानही हवेत फिरताना दिसले आणि शहरातील वीज खंडित झाली. कराचीवरून काही अज्ञात लढाऊ विमान उड्डाण घेतल्याच्या बातमीनंतर संपूर्ण शहर काळोखात बुडाल्याची दुजोरा नसलेली बातमी पाकिस्तानमध्ये सोशल मीडियात वाऱ्यासारखी पसरली. हवेत उड्डाण करतानाच्या लढाऊ विमानांचे व्हिडिओ सुद्धा पाकिस्तानी सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात शेअर केले जात आहेत. कराचीच्या स्थानिक नागरीकांनी सुद्धा याबाबत सोशल मीडियावर अनेक ट्विट केले आहेत. या बातमीनंतर कराचीच्या आकाशात पाकिस्तानी हवाई दलाची विमानंही उडताना दिसले. मात्र पाकिस्तानने अशा कोणत्याही वृत्ताला दुजोरा दिला नाही. पाकिस्तानात कथित लढाऊ विमानांनी उड्डाण केल्याच्या वृत्तानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुख्य घडामोडी

  • पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर अशी अफवा पसरली होती की काही अज्ञात लढाऊ विमान कराचीवरून उड्डाण करतांना दिसत आहे.
  • अफवावरून पाकिस्तान हादरला
  •  संपूर्ण कराची शहर वीज खंडित करण्यात आला.
  • काही काळ पाकिस्तान एअर फोर्सची विमानं हवेत उडताना दिसली.

मंगळवार, ९ जून, २०२०

राजनाथ सिंह यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकामार्फत सणसणीत प्रतिउत्तर

 
मुंबई  : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या टिकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर एका शिवसैनिकाची पोस्ट टाकून उत्तर दिले आहे. भाजप नेते राजनाथ सिंह यांनी काल शिवसेनेवर आणि महाराष्ट्र राज्य सरकारवर टीका करताना म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावाखाली एक सर्कस चालू आहे. शिवसेनेने आम्हाला धोका दिला. निवडणुकीच्या अगोदर भाजप आणि शिवसेना एकत्र लढले परंतु निवडणूकीनंतर शिवसेनाला सत्तेचा मोह झाला. सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेने भाजपाला धोका दिला. भाजपाने हा धोका पचवला. आम्ही धोका पचवणाऱ्यांपैकी आहोत धोका देणारे नाही. धोका देणे ही भाजपाची संस्कृती नाही.

याला उत्तर देताना अक्षय काळे या शिवसैनिकाची पोस्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर शेअर केली पोस्टमध्ये म्हटले आहे की, आता राजनाथ सिंह यांनी राजकारण चालू केलंच आहे तर आम्ही सुद्धा काही बोलू इच्छितो. सर्वात पहिला मुद्दा महाराष्ट्रात सर्कस चालू आहे? कोरोनाचा पहिला रूग्ण सापडल्यापासून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महाविकासआघाडीचे सरकार खंबीरपणे कोरोनाशी दोन हात करत आहेत. योग्य त्या उपाययोजना करून कोरोनाचं संकट परतवून लावण्यासाठी जिद्दीने लढत आहेत आणि राजनाथ सिंह यांना ही सर्कस वाटते? हजारो लोक कोरोनाशी झुंज देत आहेत, महाराष्ट्र पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार आणि असे हजारो जण जिवाचं रान करत आहेत ही गोष्ट राजनाथसिंह यांना सर्कस वाटते? असं असेल तर तुमच्या विचारांना साष्टांग दंडवत! राजकारण करायचं असेल तर आम्ही देखील बोलू शकतो हे विसरू नका.

केंद्र सरकारने काय केलं? टाळ्या वाजवायला लावल्या, थाळ्या वाजवायला लावल्या, नंतर दिवे लावायला लावले. देशात कोरोनाचा पहिला बाधित रूग्ण सापडल्यानंतर केंद्र सरकारने नमस्ते ट्रम्प कार्यक्रम ठेवला. कोरोनाबाधित रूग्ण सापडण्यास सुरूवात झाली तेव्हा आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली असती तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती का? बरं ठीक आहे एकवेळ असं समजू की राज्यातील आकड्यांना राज्य सरकार जबाबदार आहे. मग देशाचा कोरोनाबाधितांचा आकडा तीन लाखांच्या आसपास गेला त्यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे असंच म्हणावं लागेल? इटलीमध्ये कोरोनाचे अडीच लाख रूग्ण झाले तेव्हा तिथले पंतप्रधान अक्षरशः रडले. आपल्या देशात दोन लाख ७० हजार रूग्णसंख्या झालेली असताना देशाचे पंतप्रधान किंवा त्यांचा पक्ष बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या तयारीला लागला? लाज वाटत नाही का?

बरं दुसरा मुद्दा शिवसेनेने भाजपला धोका दिला? आता हा विषय खुप जुना झाला आहे आणि याविषयी बोलण्यात काही अर्थ नाही पण राजनाथ सिंह हे राज्यात त्यांचा पक्ष विरोधी पक्षात बसल्याच्या धक्क्यातून आत्ताशी सावरले आहेत वाटतं त्यामुळे एवढ्या उशीरा प्रतिक्रिया देत असावेत. तर बोलायचा मुद्दा हा आहे की कुणी कुणाला धोका दिला हे महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेने उघड डोळ्यांनी बघितलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी समसमान जागावाटप आणि समसमान अधिकार हा शब्द देऊन ऐनवेळी कुणी दगाबाजी केली हे सर्वांनी बघितलं आहे. समसमान जागावाटप तर केले नाहीच उलट शिवसेना उमेदवारांच्या विरोधात ४० ठिकाणी स्वत:च्या पक्षाचे उमेदवार अपक्ष म्हणून उभे केले आणि त्या बंडखोर उमेदवारांना छुपी ताकद दिली. बरं तुम्ही एवढ्यावरच थांबले नाही. महाराष्ट्राच्या जनतेच्या आशिर्वादाने तुमचा दगाबाजीचा प्लॅन फसला आणि तुमची गाडी १०५ वर थांबली. युतीची पहिली बैठक बसत नाही तोपर्यंतच देवेंद्र फडणवीस म्हणाले की पाच वर्ष मुख्यमंत्री मीच राहील. चंद्रकांत पाटील म्हणाले की गृहमंत्री, महसूल मंत्री, अर्थमंत्री, नगरविकास खाते हे आमच्याकडेच राहतील? दिलेला शब्द न पाळुन शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिला म्हणून शिवसेनेने इतर पर्यायांचा विचार केला.

राजनाथ जी, तुम्ही सर्वात मोठं हास्यास्पद बोललात की भाजप धोका पचविणाऱ्यांपैकी आहे धोका देणाऱ्यांपैकी नाही. तुमच्या या वाक्यावर लहान मुल सुद्धा हसेल. शिवसेनेला सत्तेचा मोह झाला? तुम्ही धोका देत नाही? मग भल्या पहाटे अजित पवारांसोबत गुपचूप जाऊन शपथविधी सोहळा उरकला ते काय होतं? अख्खी कॉंग्रेस राष्ट्रवादी रिकामी करून स्वत:च्या पक्षात सामावून घेतली आणि तुम्ही धोका देत नाही म्हणता? बरं शिवसेनेला सत्तेचा मोह झाला होता तर तुम्हाला झाला नव्हता का? तसं होतं तर द्यायचं होतं अडीच वर्ष मुख्यमंत्री पद काय बिघडणार होत? २५ वर्षांपासूनचा मित्रपक्ष होता, १० वर्षातले अडीच वर्ष मुख्यमंत्री पद द्यायला का नकार दिला?

कसंय ना राजनाथ जी, तुम्हाला फक्त आणि फक्त सत्ता हेच एकमेव ध्येय दिसतं, तुम्ही काळाबाजार करून आमदार फोडून किती राज्यात काय काय लफडे केले ते उभ्या देशाने बघितले आहेत. त्यामुळे तुम्ही दगाबाजी वगैरे या गोष्टी बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे. ते म्हणतात ना 'सौ चुहे खाके बिल्ली चली हे को' अगदी तसं. राहिला विषय महाराष्ट्राचा तर शिवसेनेला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करने, गृहीत धरने, फडणवीसांचा सत्तेचा मोह, मी पणा, अहंकार, सत्तेची मस्ती या गोष्टींमुळे तुम्ही विरोधात बसले आहात आणि हो धोका देणं शिवसेनेच्या रक्तात नाही. आजपर्यंत अशी एकही घटना घडली नाही ज्यात शिवसेनेने मित्राला धोका दिला. उलट महाराष्ट्रात शिवसेनेला २५ वर्ष साथ दिलेल्या मित्राने धोका दिला. त्यामुळे विनाकारण राजकारण करू नका. महाराष्ट्र राज्यात महाविकासआघाडीचं नवीन सरकार अतिशय उत्तम काम करीत आहे. वेगवेगळ्या सर्वेमधून आणि मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना मिळणाऱ्या पाठिंब्यातुन जनतेलाही हे सरकार किती योग्य वाटते आहे ते दिसुन आलेलं आहे. राज्य सरकार कोरोनाशी खंबीरपणे लढत आहे. तुम्ही तुमच्या केंद्र सरकार कडे लक्ष द्या आणि निवडणुकींच्या प्रचार बाजूला ठेवून कोरोनाच्या विषयावर लक्ष द्या.

अशाप्रकारे पोस्ट मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर टाकली आहे.

शेतकऱ्यांचा शेतीमाल लालपरी पोचविणार थेट बाजारपेठेपर्यंत सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी येथुन शुभारंभ

एसटी महामंडळाचा स्तुत्य उपक्रम

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी येथून एस. टी. महामंडळाच्या मालवाहतुक ट्रकच्या वाहतुकाचा शुभारंभ करताना भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील मोठे, आगारप्रमुख प्रविण भोंडवे आदी.

औरंगाबाद : शेतकरी व व्यापारी वर्गाला शेतमाल बाजार पेठेपर्यंत पोचविणे आता सोयीचे ठरणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने शेतीमाल वाहतूक ट्रकची सुरुवात रविवारी (ता. सात) सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी येथे करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांच्या हस्ते या मालवाहतुक ट्रक वाहतुक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 

 

या वेळी आगारप्रमुख प्रवीण भोंडवे, स्थानक तथा मालवाहतूक प्रमुख व्ही. बी. चव्हाण, वाहतूक निरीक्षक जि. ए. गवारे, वाहतूक निरीक्षक यस. एल. भापकर, वाहतूक नियंत्रक बाबासाहेब साळुंके, वाहतूक नियंत्रक राहुल राऊत यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत होती. तालुक्यातून बोरगाव कासारी ते शेकटा पहिली शेतीमालाची खेप जाणार आहे. एस. टी. महामंडळ याचे भाडे अंदाजे ४८ रुपये प्रति क्विंटल आकारणार असल्याने वाहतुकीचा खर्च कमी लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेती माल बाजारपेठेपर्यंत पोचविणे सोयीचे होणार आहे. व्यापारी वर्गांना सुद्धा याचा लाभ घेता येणार असून, त्यामुळे व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्तीचा भाव देऊ शकणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात महामंडळालाही भाड्याच्या स्वरूपात फायदा होईल. या मालवाहतुकीच्या निर्णयांमुळे व्यापारी व शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होत आहे. या प्रसंगी महामंडळाच्या ट्रकमध्ये शेतकऱ्यांचा माल सुरक्षीत राहील याची ग्वाही देतांनाच महामंडळाच्यावतीने माल वाहतुक सेवा अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिली जात आहे. याचा सर्वच शेतकरी वर्गांसह छोटे मोठ्या व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रवीण कोंडवे यांनी यावेळी बोलताना केले.

या कार्यक्रमाला एस. टी. महामंडळाचे चालक भारत खरोडे, सुधाकर गोराडे, संजय आघाडे, रामभाऊ मगर वाहक पोपट वाढेकर आदी कर्मचाऱ्यांसह शेतीमाल व्यापारी सोपान गोराडे, माजी उपसरपंच दादाराव ब्राह्मणे, शेतकरी व ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय

पिकवणे सोपे पण विकणे अवघड अशा परीस्थितीमुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल वेळेवर व सुलभरित्या बाजारपेठेपर्यंत पोचविणे जिकरीचे असल्यामुळे जागेवरच व्यापाऱ्यांना कमी भावात शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते अशावेळी शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठे अर्थिक नुकसान सहन करावे लागते. मात्र महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा शेतीमाल गावातुन थेट बाजार पेठेपर्यंत किंवा तत्सम ठिकाणी पोच करणार असल्याने शेतकऱ्यांची दोन पैशाची बचत होऊन शेतमाल थेट बाजारपेठेपर्यंत जाणार असल्याने याचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. एस. टी. महामंडळाने घेतलेल्या या मालवाहुतीकीच्या निर्णयाचे शेतकऱ्यांमधुन कौतुक होत आहे.

शनिवार, ६ जून, २०२०

मुंबईची अवस्था पाहून मुंबई सोडून नांदेड गाठले-अशोक चव्हाण


मुंबई : मुंबईत कोरोनाची अवस्था पाहून मी मुंबई सोडण्याचा निर्णय घेत नांदेडला जाण्याचा निर्णय  घेतला होता असे काँग्रेसचे वरीष्ठ नेते माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ब्रिच कँडी रुग्णालयात अकरा दिवस उपचार केल्यानंतर बरे होऊन त्यांनी कोरोनावर मात केली. त्यांना चार जुनला सुट्टी देण्यात आली.

कॉंग्रेसचे वरीष्ठ नेते व सार्वजनिक बांधाकाम मंत्री अशोक चव्हाण यांना नांदेडला कोरोना पॉझिटीव्ह झाल्यानंतर ते उपचारासाठी नांदेडहुन मुंबईला आले होते. त्यांनतर त्यांनी सांगितले की, मुंबईला माझ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचा पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर मी विचलित झालो व ही परीस्थिती कुठपर्यंत पोचली. मुंबईत ज्या गतीने कोरोना वाढत चालला आहे त्यामुळे नांदेडला स्वतःच्या घरीच थांबाव यासाठी 19 जूनला मुख्यमंत्र्यांना सकाळी भेटून मी मुंबई सोडून नांदेडला जाण्याचा निर्णय घेतला व नांदेडला गेल्यानंतर मी चार दिवस होम कॉरंन्टाईन झालो. त्यानंतरही मला कोणतेही लक्षणे दिसत नव्हते ताप, सर्दी, खोकला यासारखे काहीही नव्हते मात्र मी फॅमिली डॉक्टरांना माझ्या नोकरांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले त्यामुळे त्यांनी मला तपासण्या करुण घेण्याचा सल्ला दिल्यानंतर तपासण्या यावेळी एक्सरे काढले त्यात संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्यावर मुंबई येथील ब्रिच कँडी रुग्णालयात अकरा दिवस उपचार करण्यात आले.

यापुढे सर्वांनी खुप काळजी घ्यावी

मला या अकरा दिवसाच्या काळात खुप काही शिकायला मिळाले. आपण या गोष्टी दुसऱ्याला सांगतो बाहेर पडू नका घरीच थांबा मात्र जेव्हा स्वतःवर ही वेळ येते तेव्हा कळते. त्यामुळे सरकार देत असलेल्या सुचनांचे पालन करावे हा आजार मी खुप जवळून पाहीला आहे. त्यामुळे यापुढे कामाच्या पद्धतीत बदल करावा लागणार आहे. काम करु नका असे करता येणार नाही. यापुढे खुप काळजी घ्यावी लागणार आहे. या काळात नांदेडमध्ये एकही रुग्ण नव्हता तेव्हा अनेकजण माझे अभिनंदन केले. पण मला काळजी वाटत होती. पुढे काय होते हे सांगता येत नाही. नांदेडला स्थानिक नागरीकांमधून ही साथ पसरली नाही असेही ते म्हणाले.

कोरोनावर केली मात

कोरोनाच्या काळात मंत्री अशोकराव चव्हाण मतदारसंघात खुप फिरुण गरजवंताना मदत करणे असो की मुंबईत विविध बैठका असो त्यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर कोरोनाचा संसर्ग होणारे अशोक चव्हाण हे राज्यातील दुसरे मंत्री आहेत. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णवाहीकेतून नांदेडहून मुंबईला हलविण्यात आले होते. मुंबईत येथील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचारानंतर अकरा दिवसांनी त्यांनी कोरोनावर मात केली आहे. दोन दिवसापुर्वी म्हणजेच चार जुन रोजी त्यांना कोरोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

रुग्णालयातून स्पीकअप इंडीया मोहीमेत सहभाग


रुग्णालयात असतानाही अशोक चव्हाण हे एक्टीव्ह मोड मध्येच पहायला मिळाले यावेळी त्यांनी केलेल्या व्हिडीओत ते ते म्हणाले की, मित्र हो नमस्कार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाद्रा यांनी जी स्पीकअप इंडीया मोहीम हाती घेतलेली आहे. त्यात मी सहभाग नोंदवत आहे. कोट्यावधी देशवासियांचे जे मनोगत आहे. ज्यांचा आवाज बुलंद करण्याच्या दृष्टीकोनातून आज मी मुंबईतल्या एका हॉस्पिटलमधून कोरोनाशी लढा देत असताना स्पीकअप इंडीया मोहीमेत सहभागी होत असल्याचं जाहीर करतो. यावेळी त्यांनी त्यांचा तो व्हीडीओ ट्विटरवर शेअर केला होता.

शुक्रवार, ५ जून, २०२०

Corona update : जिल्ह्यात आज ५९ रुग्णांची वाढ, ६०९ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, ता. ५ : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना बधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी (ता. पाच) सकाळी ५९ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८२८ झाली आहे. यापैकी ११२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ९३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ६०९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

आज सकाळी बाधित रुग्णांचा तपशील (कंसात रुग्ण संख्या) : भारतमाता नगर (०१), इंदिरानगर न्यू बायजीपुरा (०१), न्यू कॉलनी, रोशन गेट (०१), भावसिंगपुरा (०१)‍, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (०१), बेगमपुरा (०१), चिश्तिया कॉलनी (०१), फाझलपुरा (०१), रेहमानिया कॉलनी (०१), गांधी नगर (०१), युनूस कॉलनी (०२), जुना मोंढा, भवानी नगर (०१), शुभश्री कॉलनी, एन सहा (०१), संत ज्ञानेश्वर नगर, एन-९ (०१), आयोध्या नगर, एन सात (०७), बुडीलेन (०३), मयूर नगर, एन अकरा (०१),विजय नगर, गारखेडा (०३), सईदा कॉलनी (०१), गणेश कॉलनी (०१), एसटी कॉलनी, फाजलपुरा (०१), रोशन गेट परिसर (०१), भवानी नगर, जुना मोंढा (०१), औरंगपुरा (०२), एन आठ सिडको (०१), समता नगर (०४), ‍मिल कॉर्नर (०२), जवाहर कॉलनी (०३), मोगलपुरा (०२), जुना मोंढा (०१), नॅशनल कॉलनी (०१), राम मंदिर, बारी कॉलनी (०१), विद्यानिकेतन कॉलनी (०१), देवडी बाजार (०१), एन सात सिडको (०१), एन बारा (०१), आझाद चौक (०१), टी.व्ही. सेंटर एन अकरा (०१), कैलास नगर (०१), इतर ठिकाणी (०१) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये १९ महिला आणि ४० पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

घाटीत एका महिलेचा मृत्यू

 शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील नेहरू नगर, कटकट गेट येथे राहणाऱ्या ३० वर्षीय गरोदर महिलेस २८ मे रोजी घाटीत दुपारी चार वाजता भरती करण्यात आले होते व त्याच दिवशी प्रसूतीनंतर त्यांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. त्यांचा अहवाल २९ मे रोजी पॉझिटिव्ह आला. त्यांच्या किडनीचे कार्य अतिशय कमी असल्याने त्यांना डायलिसिस देण्यात आले. परंतू त्यांच्या शरीरातील प्राण वायूचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार चालू असताना ४ जून रोजी दुपारी दोन वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ७२ तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण २०, मिनी घाटीमध्ये ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण ९३ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

तीन दिवसांपासून रुग्णामध्ये दुपटीने वाढ

काही दिवसांपूर्वी बधितांची संख्या दररोज २५ च्या आसपास होती त्यावेळी संक्रमण रोखण्यात यश येत असल्याचे दिसून येत असतानाच अचानक तीन दिवसांपासून हा आकडा दुपटीने वाढायला लागला आहे.

बुधवार, ३ जून, २०२०

पावसाळ्यात कोरोना वाहून जाणार की जगणार? काय आहेत जगभरातील तज्ञांचे अंदाज

कोरोना विषाणुच्या संक्रमणामुळे जगभरात लाखो नागरीक बाधित झाले तर हजारो नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतासह विविध देशांच्या शास्रज्ञांचे कोरोनाला प्रतिबंध करणारी लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र अद्याप त्याला यश आले नाही. मात्र जगभरात कोरोना बाधितांचा आकडा लाखोंच्या संख्येने वाढत चालला आहे. डिसेंबर-२०१९ म्हणजेच ऐन हिवाळ्यात आलेला कोरोना उन्हाळ्यात उष्णतेमुळे नष्ट होईल अशा प्रकारच्या बातम्या सुरवातीला पसरल्या होत्या मात्र उन्हाळ्याचा त्यावर कोणताही परीणाम झाल्याचे दिसुन आले नाही याउलट बाधितांची संख्या वाढतच गेली. पावसाळ्यात कोरोना विषाणूची झपाट्याने वाढ होईल असा अंदाज अनेक तज्ञांनी यापर्वीही व्यक्त केला आहे. यंदा जुनच्या प्रारंभालाच महाराष्ट्रात अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मात्र कोरोनाचे काय होईल याची नागरीकांना उत्सुकते बरोबरच चिंता सुद्धा लागली आहे.

कोरोना विषाणू पावसाच्या पाण्यात वाहून जाईल की कोरोना विषाणू वाढण्याला पाऊस कारणीभुत ठरेल याबाबत जगातील शास्त्रज्ञांमध्ये मतभिन्नता आहेत. त्यात अनेक तज्ञांच्या मते पावसामुळे कोरोनाचा विषाणु मोठ्याप्रमाणात पसरेल तर काहीं तज्ञांनी कोरोना पावसाच्या पाण्यात वाहून जाईल अशी शक्यता व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या जॉन्स हापकिन्स युनिव्हर्सिटीतील अप्लाइड फिजिक्सचे शास्त्रज्ञ जेर्ड इवांस यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, हात-पाय किंवा चेहरा केवळ पाण्याने धुतला तर कोरोना व्हायरस नष्ट होणार नाही त्यासाठी आपल्याला हँडवॉश किंवा साबणाचाच वापर करावाच लागेल. मात्र ‘पावसाळ्यात कोरोना व्हायरसचा परिणाम काय आणि कीती होईल याचा अंदाज अद्याप आलेला नाही.

'पावसाच्या पाण्याने कोरोनाचा विषाणू मरणार नाही. यामुळे कोरोनाचा प्रसार कमी होईलच याची शाश्वती देता येणार नाही' - जेनिफर होर्ने (शास्त्रज्ञ, संसर्गजन्य रोग विभाग, डेलावेअर युनिव्हर्सिटी)

ज्याप्रमाणे धुळीचे कण पावसाच्या पाण्यात वाहून जातात त्याप्रमाणे पावसाळ्यात पडलेल्या पाण्यामुळे कोरोना वाहुन जाईल व त्याचा प्रसार कमी होण्यास मदत होईल. - जेई बेटेन (प्राध्यापक, जागतिक आरोग्य, औषध आणि साथीचे रोग वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी)

आपण आपले हात पाण्याने धुऊन घेतल्यास व्हायरस मरणार नाही, त्यासाठी आपल्याला आपले हात, पाय किंवा चेहरा हँडवॉशने किंवा साबणाने धुवावेच लागतील. पावसाळ्याच्या तोंडावर जगभरातील तज्ञांनी कोरोना विषाणुला रोखण्यासाठी व प्रसार होऊ नये यासाठी फिजिकल डिस्टंसिंगसह तोंडाला मास्क या सारख्या नेहमी घेत असलेल्या खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात हवामानातील आर्द्रता जास्त असल्यामुळे कोरोनाचा विषाणु अनेक दिवस हवेत जिवंत राहु शकत असल्याने या विषाणुचा वेगाने प्रसार होऊन संक्रमण वाढण्याचा धोका असल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.

निसर्ग खवळला, चक्रीवादळ कुठे-कुठे धडकणार

चक्रीवादळाचा आपल्या जिल्ह्यात काय होणार परिणाम

मुंबई, ता. ३ : 'निसर्ग' चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर घोंगावत असताना महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासुुन
 बहुतेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दोन जूनला दुपारी तयार झालेल्या 'निसर्ग' चक्रीवादळाची निर्मिती झाली. सुरुवातीला कमी तीव्रतेने असलेल्या या चक्रीवादळाची तीव्रता वाढत चालली आहे.

'निसर्ग' चक्रीवादळ हे बुधवारी (ता. ०३) दुपारपर्यंत मुंबईलगत अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरून जमिनीवर प्रवेश करण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी सुमारे ११० ते १२० किलोमीटर या वेगात चक्राकार वारे वाहण्याची शक्यता आहे. या मध्ये मुंबईसह रायगड, ठाणे पालघर तर गोवा, गुजरात च्या काही भागाला याचा तडाखा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. निसर्ग वादळाची तीव्रता अशीच कायम राहिल्यास मुबंईजवळून नाशिक जळगाव या भागातून जाणार असल्याचा अंदाज आहे.

आपला जिल्हा

मराठवाड्यातील औरंगाबादसह बहुतेक जिल्ह्यांना निसर्ग चक्रीवादळाची सध्या तरी कोणताही धोका नसल्याचे दिसून येते मात्र या भागात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मुसळधार तर काही भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा

निसर्ग चक्रीवादळाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार आपल्या सोबत असून, त्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल असे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन

एकीकडे कोरोनाच्या संकटाला तोंड देत असताना दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळाचे संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असून, नागरिकांनी पुढील दोन दिवस घरातच थांबावे घराबाहेर पडू नये तसेच पत्र्याचे शेड उभारलेल्या निवऱ्यात थांबू नका. पिण्याचे पाणी भरून ठेवा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका त्यासाठी आकाशवाणी व दूरदर्शनवरील बातम्या पहा. असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले.

मंगळवार, २ जून, २०२०

तुमच्या मोबाईलमध्ये हे App आहे का? चायनिज मोबाईल App ला टक्कर देण्यासाठी भारतीयाने आणले हे App

कोरोनामुळे जगभरात चीन विरुद्ध अंतोषाची लाट पसरली असताना चीनची उत्पादनांवर प्रतिबंध घालण्याबरोबरच अनेक देशांनी चीनमधील कंपण्यांना त्या देशातून बाहेर पडण्यास सांगितले आहे. भारतातील नागरीकांनी सुद्धा त्या देशांची उत्पादने वापरु नये याबद्दल सोशल मिडीयाच्या माध्यमातून चर्चा घडून येत आहेत. त्याचबरोबर आपण वापरत असलेल्या मोबाईलमध्ये आपण अनेक चायनीज Apps वापरत आलो आहे. यामध्ये कोणते मोबाईल App चायनीज व कोणते मोबाईल App चायनिज नाहीत हे अनेकांना माहीत नसते त्यामुळे चायनीज App मोबाईल मधून काढून टाकावे पण माहीती नसल्यामुळे ते काढणे अनेकांना शक्य होत नाही. यावर चांगला उपाय onetuch या App बनविणाऱ्याने आणला आहे. त्यांनी Remove China Apps हे मोबाईल App गुगल प्ले स्टोअर वर आणले आहे. साडेतीन एमबी चे हे App आपण आपल्या मोबाईल मध्ये Install केल्यानंतर SCAN NOW या बटनवर क्लीक केल्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये समाविष्ट असलेले सर्व चायनीज मोबाईल App स्क्रिनवर दिसू लागतात त्यातून आपण ते Application Uninstall करु शकतो. सुरवातील प्रायोगिक तत्वावर सुरु केलेल्या Remove China Apps या Appला वापरकर्त्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. काही दिवसातच हे App इन्टाल करणाऱ्यांचा आकडा पाच दशलक्षाच्या पुढे गेल्याचे पहायला मिळते.

चीन विरुद्धचा रोष कारणीभुत

कोरोना विषाणू चीनच्या चुकीमुळे सर्व जगताला मोठा त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल अमेरीकेसह प्रमुख देश याबद्दल चीनला दोषी धरत आहेत त्याप्रमाणे भारतातही त्याचा परीणाम जाणवत आहे तर दुसरीकडे चीन भारताच्या हद्दीत घुसघोरी करुन कुरापती काढून विस्तारवात जोपासत असतो. सध्या लद्दाख येथे भारत-चीन च्या Line of Actual Control वर दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर सुद्धा या Appला वापरकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे मानले जाते.

मोदींनी केले होते आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला संबोधित करताना ग्लोबल सुद्धा कधी लोकल होता व त्या देशातील जनतेने लोकल उत्पादनाचा स्विकार केल्यानेच ते सध्या ग्लोबल बनल्याचे सांगितले होते. त्यामुळे प्रत्येक भारतीयांनी आत्मनिर्भर बना असे आवाहन केले होते. त्यानंतर या आत्मनिर्भर यावर सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणात चर्चा रंगल्या मात्र त्याचा रोख पुर्णपणे चायनीज उत्पादनां विरुद्ध दिसून येत होता. त्यानंतरच वन टच या भारतातील App तयार करणाऱ्याने Remove China Apps ची निर्मीती केली. अल्पावधीतच हे App मोठ्याप्रमाणात वापरल्या गेल्याने भारतीयांमध्ये सुद्धा प्रतिभा असल्याचे दिसुन येते.

Corona update : जिल्ह्यात आज ५५ रुग्णांची वाढ, ५१४ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, ता. ०२ : औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता. दोन) सकाळी आलेल्या अहवालात ५५ जण पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याने कोरोनाबाधितांचा आकडा १६४२ झाला आहे. यापैकी १०४९ कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून ७९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सध्या ५१४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

दोन जूनला सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. शहा बाजार (०१), किराडपुरा (०२), चंपा चौक (०१), कटकट गेट (०१), नारळीबाग (०१), गणेश कॉलनी (०१), जवाहर नगर (०३), भीम नगर (०२), हमालवाडी (०१), शिवशंकर कॉलनी (०२), नाथ नगर (०२), ज्योती नगर (०१), फजलपुरा परिसर (०१), मिल कॉर्नर (०१), एन-३ सिडको (०१), एमजीएम परिसर (०१), रोशन गेट (०१) , विशाल नगर, गारखेडा परिसर (०१), एन-सहा संभाजी कॉलनी (०७), समता नगर (०५), अंहिसा नगर (०१), मुकुंदवाडी (०१), विद्या निकेतन कॉलनी (०१), न्याय नगर (०१), बायजीपुरा (०२), संजय नगर, मुकुंदवाडी (०४), विजय नगर (०२), यशवंत नगर, पैठण (०१), चंपा चौक, म्हाडा कॉलनी (०१), नेहरु नगर (०१), जुना मोंढा नाका परिसर (०१), इतर ठिकाणी (०३) या भागात कोरानाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये २४ महिला आणि ३१ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

मृतांची संख्या ७९

औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये खिवंसरा पार्क, गारखेडा परिसरातील कोरोनबाधित असलेल्या ६४ वर्षीय पुरूष रुग्णाचा एक जून रोजी रात्री ११.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ६३, तीन खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १५, मिनी घाटीमध्ये ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण ७९ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले

सोमवार, १ जून, २०२०

औरंगाबाद जिल्ह्यात 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत कोणते निर्बंध शिथिल होणार

औरंगाबाद, ता. ०१ : कोरोनाला हरविण्यासाठी शासन एक जून ते ३० जून या कालावधीत लॉकडाऊन ५.० म्हणजेच अनलॉक १.० राबवित आहे यामधील नियमावली काय आहेत व कोणकोणते निर्बंध शिथिल होणार व कोणते कायम राहणार हे वाचा सविस्तर
राज्य शासनाच्या निर्देशानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊनचा कालावधी दिनांक ३० जून २०२० च्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हादंडाधिकारी उदय चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम मधील तरतुदीनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी (पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) हे मनाई आदेश जारी केले असून हे आदेश यापुढे दिनांक ३० जून २०२० च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील. तसेच पोलीस आयुक्तालय क्षेत्राबाबत पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे आदेश अंमलात राहतील.

औरंगाबाद जिल्हयासाठी एक जून पासून नियमावली व उपाययोजना
रात्रीची संचारबंदी - अत्यावश्यक बाबी वगळता रात्री नऊ ते सकाळी पाच वाजेपर्यत नागरिकांची हालचाल/आवागमन पुर्णपणे प्रतिबंधीत करण्यात येत आहे.
कमजोर व्यक्तींना/गटांना संसर्गापासून संरक्षण
६५ वर्षावरील जेष्ठ नागरीक, यापूर्वी इतर आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, १० वर्षा खालील बालके, वैद्यकीय बाबी व अत्यावश्यआक बाबी वगळता राष्ट्रीय निर्देकांनुसार घरी राहतील यांची दक्षता घ्यावी.
कन्टेनमेंट झोन-
  • i. सार्वजनिक आरोग्य कुटुंबकल्याण मंत्रालयाने निश्चित केलेल्या मागदर्शक तत्वांनुसार महानगरपालिका / जिल्हा प्रशासनाकडुन कन्टेनमेंट झोन निर्धारीत करण्यात येईल.
  • ii. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त, महानगरपालिका, औरंगाबाद तर जिल्हयाच्या उर्वरित भागात जिल्हाधिकारी, औरंगाबाद हे कन्टेनमेंट झोनची निश्चिती करतील. कन्टेनमेंट झोन हे रहिवाशी कॉलनी, मोहल्ला, झोपडपटटी, इमारत, इमारतीचा समुह, गल्ली्, महानगरपालिका वार्ड, पोलीस स्टेशनची हद्द, खेडेगांव, गांवाचा समूह, ग्रामपंचायतयांच्या आधारे निश्चित करण्यात येईल.
  • iii. कन्टेानमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा चालु राहतील. कन्टेनमेंट झोनमध्ये नागरीकांची ये-जा रोखण्यासाठी काटेकोर परिघीय नियंत्रण ठेवण्यात यावे. कन्टेनमेंट झोनमध्ये केवळ वैद्यकीय, आपत्कालीन सेवा आणि जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठीच नागरीकांचे आवागमण चालु राहील. याबाबतीत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्या‍ण मंत्रालयाचे मार्गदर्शक तत्वाचे पालन करणे बंधनकारक आहे.

निर्बंध शिथील करणे व टप्याटप्याने लॉकडाऊन उघडणे

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात कन्टेंनमेंट क्षेत्र वगळता खालील बाबींना निर्बधासह चालू करण्यास परवानगी राहील. ज्या बाबींना यापुर्वी परवानगी देण्यात आली आहे. शासन अधिसूचनेनुसार साथरोग नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्याससाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच मा.मुख्य सचिव यांचे पत्रानुसार आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद यांना औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये बाजार/दुकाने यांचे नियंत्रण करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेले आहे.
त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये लॉकडाऊनबाबत आयुक्त, महानगरपालिका औरंगाबाद यांचे आदेश लागू राहतील.

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्र वगळून वि‍वक्षीतपणे प्रतिबंध नसलेल्या सर्व गोष्टींना खालील अटी व शर्तीवर परवानगी राहील.
  • a. अनुज्ञेय असलेल्या कुठल्या ही बाबीसाठी कोणत्याही शासकीय अधिका-यांची परवानगीची आवश्यक असणार नाही.
  • b. क्रिडा संकुले व क्रिडागृहे तसेच सार्वजनिक वापरातील खुल्या जागावर वैयक्तीक व्यायाम करण्या‍साठी परवानगी राहील. तथापी प्रेक्षक आणि समुह गतीविधींना परवानगी असणार नाही. सर्व प्रकारचे शारीरीक व्यायाम आणि इतर सर्व गोष्टी योग्य सामाजिक अंतर ठेवून करणे आवश्यक आहे.
  • सर्व शासकीय व खाजगी वाहतुकीसाठी खालील प्रमाणे प्रवासी अनुज्ञेय असतील.
  • i. दुचाकी – केवळ चालक
  • ii. तीनचाकी- चालक व इतर २ प्रवासी
  • iii. चारचाकी- चालक व इतर २ प्रवासी
  • d. सामाजिक अंतर व निर्जतुकीकरणाच्या उपायांचा अवलंब करुन जिल्हया अंतर्गत बस वाहतूक जास्तीत जास्त ५० टक्कें क्षमतेने करता येईल.
  • e. आंतर जिल्हार बस वाहतूक बंद राहील.
  • f. सर्व बाजार / दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यत सुरु राहतील. तथापी गर्दी उसळल्यास व सामाजिक अंतराच्या तत्वाचे पालन होत नाही असे दिसून आल्यास स्थानिक प्राधिकरणाने संबंधीत बाजार/दुकाने तात्काळ बंद करावीत.
मनाई आदेशा दरम्यान दिनांक ३० जून २०२० पर्यत प्रतिबंधीत असलेल्यार बाबी खालीलप्रमाणे आहेत -
  • i. सर्व शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारच्या शैक्षणीक संस्था, प्रशिक्षण केंद्रे, शिकवणी वर्ग/संस्था बंद राहतील. तथापी ऑनलाईन/दुरस्थ शिक्षणाला परवानगी राहील.
  • ii. सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवासी हवाई वाहतूक - वैद्यकीय सेवा, एअर अॅम्बु्लन्स्, सुरक्षा विषयक बाबी आणि गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या बाबी वगळून बंद राहील.
  • iii. रेल्वे प्रवासी वाहतूक व खाजगी विमान सेवा बंद राहतील तथापी स्वतंत्र आदेशाव्दारे परवानगी दिलेल्या बाबी वगळून.
  • iv. सर्व सिनेमा गृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, प्रेक्षागृहे, बार, सभागृहे, मंगल कार्यालये आणि एकत्रित जमण्याची ठिकाणे आणि तत्सम इतर ठिकाणे.
  • v. सर्व सामाजिक/राजकीय/ क्रिडा विषयक/ मनोरंजन /शैक्षणिक / सांस्कृतीक /धार्मिक कार्यक्रम / इतर संमेलने.
  • vi. सर्व धार्मिक स्थळे तसेच इतर सर्व प्रार्थना स्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद राहतील. सर्व धार्मिक सभा/परिषदा बंद राहतील.
  • vii. शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरेंट आणि इतर सर्व आदरातिथ्य सेवा बंद राहतील. मात्र आरोग्य/पोलीस/शासकीय अधिकारी/आरोग्य विषयक कर्मचारी, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व्यक्ती जसे की, पर्यटक आणि अलगीकरणासाठी आवश्यक असणारी आदरातिथ्य सेवा चालु राहतील. तसेच बस डेपो, रेल्वे स्टे्शन आणि विमानतळावरील उपहारगृहे चालू राहतील. घरपोच सेवा देण्याासाठी उपहारागृहाना त्यांचे किचन चालू ठेवता येईल.
ठराविक व्यक्ती व वस्तुच्या आवागमणास सुनिश्चित करण्यायबाबतचे विशेष निर्देश
  • i. सर्व वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत व्यक्ती जसे की, डॉक्टर्स, नर्सेस, सर्व पॅरामेडीकल कर्मचारी, स्वच्छ्ता कर्मचारी, अॅम्बूलन्स यांना कोणत्याही निर्बंधाशिवाय आंतरराज्यीय आणि आंतर-जिल्हा आवागमनास परवानगी राहील.
  • ii. निर्गमित केलेल्या आदर्श मार्गदर्शक तत्वानुसार आंतरराज्य व आंतर जिल्ह्यात अडकलेल्या कामगार, प्रवासी कामगार, यात्रेकरू, पर्यटक इत्यादींच्या हालचाली नियंत्रित असतील.
  • iii. निर्गमित केलेल्या आदर्श मार्गदर्शक तत्वानुसार श्रमिक विशेष गाड्या चालू राहतील.
  • iv. सर्व रिकाम्या ट्रकसह सर्व प्रकारच्या वस्तू‍ /मालवाहतुकीची आंतरराज्यीय हालचाल करण्यास परवानगी राहील.

  • आरोग्य सेतू अॅपचा वापर

  • i. आरोग्य सेतू अॅपचा वापर हे संसर्गाची संभाव्य धोक्याची सुरवातीच्या काळात माहिती देते त्यामुळे ते व्यक्तींसाठी व समाजासाठी सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते.
  • ii. कार्यालये व कामाच्या ठिकाणांची सुरक्षीतता विचारात घेता जास्तीत जास्त कर्मचारी आरोग्य सेतू अॅप अनुरुप मोबाईल फोनमध्ये Install करतील याची खात्री करावी.
  • iii. जिल्हा प्रशासन नागरिकांना आरोग्यक सेतू अॅपचा वापर करावा आणि त्यांचे आरोग्याची अद्ययावत माहिती सदरील अॅपवर अपलोड करावी असे आवाहन करीत आहे. जेणे करून जोखमीच्या वेळी सबंधीताना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देता येईल.

  • स्थानिक पातळीवर नागरीकांनी स्व.तः हून काही आस्थापना/दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी अत्यावश्यक गोष्टींची दुकाने,औषधालये व कृषि सेवा संबंधीत दुकाने कोणत्याही परिस्थितीत चालु राहतील.
MISSION BEGIN AGAIN
कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे
सार्वजनिक ठिकाणे-
  • ०१. सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्याय ठिकाणी व प्रवास करतांना फेस मास्कावापरणे बंधनकारक आहे.
  • ०२. सार्वजनिक ठिकाणी दोन व्य,क्ती्मधील अंतर किमान सहा फुट ठेवावे. दुकानामध्येच ग्राहकाची संख्याा एकावेळी पाच पेक्षा जास्ता असणार नाही. याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधीत दुकानदार/आस्‍थापना चालक यांचेवर राहील.
  • ०३ मोठया प्रमाणावर गर्दी होणारे ठिकाणे जसे की, संमेलने/परिषदा इ. प्रतिबंधीत असतील.
  • विवाहा सारख्या सार्वजनिक कार्यक्रमात सामाजिक अंतर ठेवून ५० पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी नसेल तसेच अंत्यविधीसाठी २० पेक्षा अधिक
  • व्यक्तींना परवानगी असणार नाही.
  • ०४ सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या‍ ठिकाणी थुंकणे दंडनिय राहील व त्या साठी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कायद्यानुसार दंड आकारण्यात यावा.
  • ०५. सार्वजनिक ठिकाणी पान, तबाखू, गुटखा, मद्य, धुम्रपान यांचे सेवन करण्याास मनाई राहील.
  • ०६. पान, तंबाखूची दुकाने, रेस्टॉरंट पुर्णपणे बंद राहतील.
कामाच्या ठिकाणाबाबत अतिरिक्त सूचना
  • ०७. जेथे शक्य असेल तेथे जास्तीत जास्ते घरी राहून काम (Work from Home ) चा अवलंब करावा.
  • ०८. सार्वजनिक आरोग्यय व कुटुंब कल्याण विभागाकडुन निर्गमित सूचनानुसार सर्व प्रवेश व निर्गम स्थाानावर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटाइझर व हात धुण्याची सुविधा उपलब्ध करावी. कामाच्यार ठिकाणी पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर, हॅड वॉश उपलब्ध करुन देण्यात यावे.
  • ०९ सर्व कामाच्याे ठिकाणाचे, सार्वजनिक सुविधांचे आणि मानवी संपर्कात येणारी सर्व ठिकाणी जसे की, दरवाजाचे हॅडल आदींचे दोन पाळया दरम्यान तसेच वांरवार निर्जतूकीकरण करावे.
  • १०. दोन पाळयामध्ये सुयोग्य अंतर ठेवून तसेच भोजन अवकाश योग्य वेळेचा ठेवून व इतर मार्गाचा वापर करून कामाच्या ठिकाणी योग्य सामाजिक अंतर पाळले जाईल यांची दक्षता घ्यावी.

  • i. सर्व अत्यावश्ययक सेवा पुरविणा-या दुकानांना यापुर्वीच्या आदेशाप्रमाणे चालु राहण्यास परवानगी असेल.
  • ii. सर्व अत्यावश्ययक सेवा पुरवित नसलेल्या दुकानांना यापुर्वीच्या आदेशाप्रमाणे दिलेली सुट व मार्गदर्शक तत्वांच्या आधारावर चालु राहण्या‍स परवानगी राहील. तसेच अशी दुकाने संबंधीत महानगरपालिकांनी घेतलेल्या निर्णयानुसार कार्यरत राहतील.
  • iii. सर्व अत्यावश्यक वस्तु/साहित्य व अत्यावश्यक नसलेल्या वस्तु्/साहित्य यांच्या ई-कॉमर्स सेवा चालू राहतील.
  • iv. सद्या चालू असलेली सर्व औद्योगिक केंद्रे कार्यरत राहतील.
  • v. सर्व बांधकामाशी निगडित क्षेत्रातील (सार्वजनिक/खाजगी) कामे सुरु राहतील. तसेच सर्व मान्सुसनपुर्व कामे (सावर्जनिक/खाजगी) सुरु राहतील.
  • vi. घरपोच सेवा देण्यासाठी उपहारागृहाना त्यांचे किचन चालू ठेवता येईल.
  • vii. ऑनलाईन /दुरस्थ शिक्षणाला परवानगी राहील.
  • viii. सर्व शासकीय कार्यालये पाच टक्के किंवा १० व्यक्ती (जे जास्त असेल ते) या तत्वावर चालू राहतील.
  • ix. नागरीकांच्या हालचालीसाठी खालील प्रमाणे प्रवासी अनुज्ञेय असतील.
  • i. दुचाकी – केवळ चालक
  • ii. चारचाकी- चालक व इतर दोन प्रवासी
  • x. एखाद्या विशेष किंवा सर्वसाधारण आदेशानुसार इतर कोणत्या ही बाबींसाठी परवानगी राहील.
दंडात्मक तरतूदी – उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्दा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भा.दं.वि. १८६० चे कलम १८८ नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्द कुठल्यांही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही.

पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हे देशाचे अहम भाग्यच सामनातुन स्तुतीसुमने


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे व त्यांची बरोबरी करणारा आज एकही नेता सध्याच्या घडीला नाही. त्यांच्यात असलेली राष्ट्रकार्याची तळमळ व या काळात त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतल्याचे शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून स्तुतिसुमने उधळण्यात आले आहेत. मात्र गेल्या साठ वर्षात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती मागच्या सहा वर्षात सुद्धा झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेले चुकीच्या पद्धतीने लॉकडाऊन व त्यानंतर स्थलांतरित मजुरांची गावी जाण्यासाठी झालेली परवड ही फाळणीत निर्वासितांची आठवण करून देते. ही चूक कशी दुरुस्त करणार? मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच अशी स्तुती करताना दुसरीकडे नोटबंदी व लॉकडाऊनच्या काळात ज्यांना नाहक जीव गमवावा लागला ते कोणत्या अमृताने जिवंत करणार? अशा कानपिचक्या या अग्रलेखातून देण्यात आल्या आहेत.

सामनाचा संपादकीय लेख

पंतप्रधान मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे व त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. त्यांना राष्ट्रकार्याची तळमळ आहे. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. अर्थात साठ वर्षात चुका झाल्या तशा मागच्या सहा वर्षातही झाल्या. गेल्या दोन महिन्यांत चुकीच्या पद्धतीने केलेले लॉक डाऊन व त्यानंतर स्थलांतरित मजुरांची ससेहोलपट ही फाळणीतील निर्वासितांचीच आठवण करून देणारी आहे. ही चूक कशी दुरुस्त करणार? मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच, पण नोटबंदी आणि लॉक डाऊन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार?

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळास एक वर्ष पूर्ण झाले. कोरोनाचे संकट नसते तर दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला वर्धापन दिन भारतीय जनता पक्षाने थाटात साजरा केला असता. तरीही समाज माध्यमे व प्रसिद्धीमाध्यमांच्या मदतीने हा पहिला वर्धापन दिन झोकात साजरा केला असे प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून दिसते. मोदी सरकार साधारण सहा वर्ष सत्तेवर आहे. पूर्ण बहुमत असल्याने त्यांचे सरकार पांगुळगाड्याच्या आधारे चाललेले नाही, पण देशाचा मात्र अनेक बाबतीत पांगुळगाडा झाला आहे असा आरोप विरोधक करीत आहेत. दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्धापन दिनानिमित्त भाजप पुढाऱ्यांची विधाने प्रसिद्ध झाली आहेत ती गमतीची आहेत. मागील 70 वर्षांतील उणिवा मोदी सरकारच्या 6 वर्षांतील कार्यकाळात दूर झाल्या आहेत, असा दावा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे तर गृहमंत्री अमित शहा यांचे म्हणणे जरा वेगळे आहे. पंतप्रधान मोदी यांनी सहा दशकांतील ऐतिहासिक चुका दुरुस्त करण्याचे मोठे काम केले आहे असे श्री. शहा म्हणतात. कोरोना संकटकाळात मोदी हे पंतप्रधान आहेत हे भारत देशाचे भाग्यच म्हणावे लागेल असा बाण संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी मारला आहे. मोदी यांचा आत्मनिर्भर भारत नेमका कसा घडतो आहे ते या तीन प्रमुख नेत्यांच्या बोलण्यातून दिसते. एकंदरीत असे दिसते की, आपल्या महान देशाला फक्त सहा-सात वर्षांचाच इतिहास आहे.

त्याआधी हा देश नव्हता. स्वातंत्र्य लढा नव्हता. त्यातील संघर्ष आणि बलिदाने हा फक्त आभास होता. देशातील सामाजिक, वैज्ञानिक, वैद्यकीय, औद्योगिक क्रांती वगैरे सगळे झूट आहे. साठ वर्षांत काहीच घडले नाही. महाराष्ट्रातला सह्याद्री पर्वत, हिमालय, कांचनजुंगा, गंगा-यमुना, कृष्णा-गोदावरी हे सर्व सहा वर्षांतच निर्माण झाले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग ही माणसे अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे त्यांच्या हातून जे कार्य घडले असे सांगितले जाते ते सर्व बोलबच्चनगिरीचे नमुने आहेत. श्री. नड्डा हे एक सद्गृहस्थ आहेत, पण त्यांनी जे सांगितले ते हास्यास्पद आहे. कोरोनाचे संकट जागतिक आहे. बड्या राष्ट्रांच्या आरोग्य सेवा कोलमडल्या असताना हिंदुस्थानात लॉक डाऊनच्या काळात दररोज कोरोना टेस्ट क्षमता 10 हजारावरून 1.60 लाखांवर गेली आहे. आज देशात दररोज 4.50 लाख पीपीई किटस् बनविल्या जात आहेत. 58 हजार व्हेंटिलेटर्स बनत आहेत. हे आत्मनिर्भरतेचे लक्षण नाही काय? असा प्रश्न डॉ. नड्डा विचारतात. अर्थात याआधी देशातून पोलिओसारखे आजार हद्दपार केले गेले. टीबी, मलेरिया नियंत्रणात आणला हे कोणत्या सरकारने केले? कोरोना आज आला, त्याआधी प्लेगसारखी महामारी येऊन गेली. डॉक्टरसाहेब, देशात व्हेंटिलेटर्स आधीही होतेच व ती चीनकडून मागवली जात नव्हती.

मागच्या साठ वर्षांत ‘कोरोना’चे संकट नव्हते. त्यामुळे आजच्या इतकी व्हेंटिलेटर्सची गरज नव्हती, पण साठ वर्षांत ‘एम्स’सारख्या वैद्यकीय संस्था, लाखो डॉक्टर्स, सरकारी इस्पितळे, आयसीएमआरसारख्या संस्था निर्माण झाल्या. ज्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्या प्रे. ट्रम्प यांनी दमदार आवाजात हिंदुस्थानकडे मागितल्या (कोरोनाशी लढण्यासाठी) त्या गोळ्यांचे उत्पादन इंदिरा गांधी यांच्याच काळात सुरू झाले व त्याच आत्मनिर्भरतेतून देशात वैद्यकीय क्रांतीची बीजे रोवली हे कसे विसरता येईल? मोदी यांनी ऐतिहासिक चुका दुरुस्त केल्या हे मान्य. कश्मिरातून ३७० कलम हटवले. तीन तलाक पद्धत बंद केली. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर निर्माण कार्य सुरू करण्यासंदर्भात निकाल दिला. हे सर्व मागच्या सहा वर्षात झाले व त्याबद्दल मोदी सरकारला श्रेय द्यावेच लागेल, पण १९७१ साली इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून ‘फाळणी’चा सूड घेतला ही ऐतिहासिक चूक मानायची की, ऐतिहासिक कार्य? हेसुद्धा समजून घ्यावे लागेल. राजीव गांधी यांनी डिजिटल क्रांतीची सुरुवात केली. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी कोसळलेल्या अर्थव्यवस्थेस गती दिली. म्हणूनच आजचा हिंदुस्थान उभा आहे. ही चूक असेल तर ती कोणत्या मार्गाने तुम्ही दुरुस्त करणार आहात? ज्या ७० वर्षांतील उणीवा सहा वर्षांत दूर झाल्या त्या ७० वर्षांत अटल बिहारी वाजपेयी यांची साडे पाच वर्ष, विश्वनाथ प्रताप सिंग व चंद्रशेखर यांची मिळून दोनेक वर्ष व जनता पक्षाची सव्वा दोन वर्ष आहेत. हा कालखंड वाया गेला व फक्त मागील सहा वर्षांत देश उभा राहिला असे कोणी म्हणत असेल तर ती इतिहासाशी बेईमानी ठरेल.

वीर सावरकर यांचा अपमान करण्याची घोडचूक मागच्या साठ वर्षांत नक्कीच झाली, पण ही घोडचूक दुरुस्त करण्यासाठी सावरकरांना भारतरत्न देण्याचा मार्ग गेल्या सहा वर्षांत स्वीकारला गेला नाही. सहा वर्षात जे घडवले गेले ते जगासमोर आहे. नोटबंदी, जीएसटीसारख्या निर्णयांनी अर्थव्यवस्थेचे पानिपत झाले. गरिबी वाढली. रोजगार संपला. प्रत्येक चार माणसामागे आज एकजण बेकार आहे. सार्वजनिक कंपन्या मोडीत काढून आणि विकून आर्थिक सुधारणांचा डांगोरा पिटला जात आहे. एअर इंडियासारख्या राष्ट्रीय कंपन्या कधीही जमिनीवर कोसळतील. कश्मिरातील तणाव ३७० हटवूनही संपलेला नाही. सिक्कीम आणि लडाखच्या सीमेवर चीनचे सैन्य आमच्या छाताडावर बंदुका ताणून उभे आहे. नेपाळसारखे मुंगीइतके राष्ट्र आमच्या भूभागावर हक्क सांगत आहे. हे काही आत्मनिर्भर मजबूत असल्याचे लक्षण नाही. पंतप्रधान मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे व त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. त्यांना राष्ट्रकार्याची तळमळ आहे. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. अर्थात साठ वर्षांत चुका झाल्या तशा मागच्या सहा वर्षांतही झाल्या. गेल्या दोन महिन्यांत चुकीच्या पद्धतीने केलेले लॉक डाऊन व त्यानंतर स्थलांतरित मजुरांची ससेहोलपट ही फाळणीतील निर्वासितांचीच आठवण करून देणारी आहे. ही चूक कशी दुरुस्त करणार? ते आधी सांगा. मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच, पण नोटबंदी आणि लॉक डाऊन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार?

Corona update : जिल्ह्यात आज २६ रुग्ण वाढले


औरंगाबाद, ता. ०१ : औरंगाबाद शहर व जिल्ह्यात सोमवारी (ता. एक) सकाळी आलेल्या अहवालात २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५६९ झाली आहे.

कोरोना बाधित रुग्ण कोणत्या परिसरात आढळले ते पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) : नवी वस्ती, जुना बाजार (०२), चिस्तीया कॉलनी (०२), उस्मानपुरा (०१), एन आठ सिडको (०२), भवानी नगर (०४), शिवशंकर कॉलनी (०१), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (०२), आझम कॉलनी (4), एन सहा सिडको (1), युनूस कॉलनी (०१), मुकुंदवाडी (०१), मिसरवाडी परिसर (०१), नारेगाव (०१), रेहमनिया कॉलनी (०१), वैजापूर (०२) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये १३ महिला आणि १३ पुरुषांचा समावेश आहे.

एकूण १५६९ रुग्णांपैकी रविवारपर्यंत (ता. ३१) १०२९ कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून ७२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ४६८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

कोरोना मीटर
एकूण रुग्ण १५६९
बरे झाले १०२९
मृत्यू ७२
उपचार सुरु ४६८

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना त्वरित खत मिळाले नाही तर कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, सिल्लोड भाजपचा निवेदनाद्वारे इशारा

सिल्लोड : उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात युरिया त्वरित उपलब्ध करावा ...

लोकप्रिय बातम्या व लेख